१ लाख ६८ हजार हेक्टरमध्ये होणार धानाची लागवड
By Admin | Updated: June 9, 2014 23:38 IST2014-06-09T23:38:23+5:302014-06-09T23:38:23+5:30
जिल्ह्यात बाराही तालुके मिळून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४६ हजार ८00 हेक्टर इतके आहे. सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात २५ हजार ४00 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र धान पिकाचे आहे.

१ लाख ६८ हजार हेक्टरमध्ये होणार धानाची लागवड
गडचिरोली : जिल्ह्यात बाराही तालुके मिळून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४६ हजार ८00 हेक्टर इतके आहे. सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात २५ हजार ४00 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र धान पिकाचे आहे. कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाचे लक्षांक प्रस्तावित केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. रोजगाराच्या दुसर्या कुठल्याही संधी नसल्यामुळे कृषी क्षेत्रावरच जिल्ह्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार गडचिरोली तालुक्यात भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १३ हजार ७00, आरमोरी १४ हजार, देसाईगंज ८ हजार ४00, कुरखेडा १५ हजार ४00, कोरची ९ हजार २00, धानोरा १७ हजार ७00, चामोर्शी २५ हजार ४00, मुलचेरा ५ हजार ७00, अहेरी ८ हजार ७00, एटापल्ली १३ हजार ५00, भामरागड ८ हजार ५00 आणि सिरोंचा तालुक्यात भात पिकाचे ६ हजार ६00 सर्वसाधारण क्षेत्र आहे.
यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने धान पिकाच्या लागवडीचे लक्षांक वाढविले आहे. गडचिरोली तालुक्यात १८ हजार ५00, आरमोरी १७ हजार ५00, देसाईगंज ११ हजार, कुरखेडा १४ हजार ५00, कोरची ११ हजार, धानोरा १९ हजार ५00, चामोर्शी २८ हजार, मुलचेरा ७ हजार ५00, अहेरी १0 हजार ५00, एटापल्ली १४ हजार ५00, भामरागड ७ हजार ५00 आणि सिरोंचा तालुक्यात ८ हजार हेक्टर क्षेत्र धान पिकासाठी प्रस्तावित केले आहे.
जिल्ह्यात ३ हजार २00 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र सोयाबिन पिकाचे आहे. यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने सोयाबिन पिकाचे ३ हजार ७४0 हेक्टर इतके क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यात गडचिरोली २५0 हेक्टर क्षेत्र, आरमोरी ५0 हेक्टर क्षेत्र, देसाईगंज २५ हेक्टर, कुरखेडा ५0, कोरची ५0, धानोरा ५0, मुलचेरा १४0, अहेरी ५00, एटापल्ली २५, सिरोंचा १00 हेक्टर क्षेत्र आणि सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात अडीच हजार हेक्टर क्षेत्र सोयाबिन पिकाच्या लागवडीसाठी कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार गेल्या २ वर्षात आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा आदी तालुक्यात सोयाबिन पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र नाही. मात्र यंदा भामरागड तालुक्याशिवाय इतर सर्व तालुक्यात सोयाबिन पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याच्या कृषी विभागाने वार्षिक नियोजनात निश्चित केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)