अपंगांत जगण्याची उमेद निर्माण करा
By Admin | Updated: November 24, 2015 01:48 IST2015-11-24T01:48:55+5:302015-11-24T01:48:55+5:30
समाजात इतरांसारखे जगता येत नाही, अशी भावना अंध, अपंगांमध्ये असते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. परिणामी ते

अपंगांत जगण्याची उमेद निर्माण करा
वैरागड : समाजात इतरांसारखे जगता येत नाही, अशी भावना अंध, अपंगांमध्ये असते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. परिणामी ते समाजात आत्मसन्मानाने जगू शकत नाही. त्यांच्यात आत्मसन्मान जागृत करण्यासाठी जगण्याची उमेद निर्माण करावी, असे आवाहन डॉ. सतीश गोगुलवार यांनी केले.
सोनेरांगी येथे सोमवारी जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य सरिता वाटगुरे होत्या. यावेळी प्रवचनकार संपूर्णा आळंदीकर पं. स. सदस्य कविता दडमल, प्रा. प्रदीप बोडणे, सरपंच निता घोडाम, मुख्याध्यापक तिभागे, ग्रा. पं. सदस्य अंताराम तुलावी, तंमुस अध्यक्ष टिकाराम मांदाडे, माजी पं. स. सभापती गजानन कुमरे, निराशा जांभुळकर, जिल्हा अपंग संघटनेचे अध्यक्ष दिनकर चंदनखेडे, शारदा लक्षणे, त्र्यंबक बन्सोड, सुलतानखॉ पठाण उपस्थित होते. व्यक्तीला अपंगत्त्व प्राप्त झाल्यास त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होते. अपंग हे दुदैवी असले तरी त्यावर मात करता येऊ शकते. अपंगांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी, असे आवाहनही डॉ. सतीश गोगुलवार यांनी केले.
यावेळी प्रवचनकार संपूर्णा आळंदीकर यांनी अपंगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याने अपंगांना नेहमी सहकार्य करावे, त्यांच्या हितासाठी झटावे, असे मार्गदर्शन करीत संतांचे अनेक दाखले देऊन अंध अपंगांची सेवा ज्यांनी केली त्यांना संत रूप प्राप्त झाले, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजना जांभुळे, प्रेमिला, मनोहर सतीबावणे, ताराचंद साखरे, दिगांबर रणदिवे, पत्रुजी कन्नाके, सोमेश्वर चौधरी यांनी सहकार्य केले. संचालन संघटनेचे सचिव बाबुराव कुमरे तर आभार रिता जनबंधू यांनी मानले. (वार्ताहर)