शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

कापूस व मिरची विक्रीसाठी केंद्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

सिरोंचा शहर तसेच तालुक्यात मिरची व कापसाचे शासकीय आधारभूत केंद्र नाही. तसेच खासगी खरेदी केंद्र तसेच जिनिंग मिलची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी माल निघाल्यानंतर अडचणीत सापडतात. यावर्षी सिरोंंचा तालुक्या धानासोबतच बºयाच क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या वतीने येथे खासगी अथवा शासकीय कापूस खरेदी केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देउत्पादक शेतकऱ्यांची धावपळ : तेलंगण राज्यात न्यावा लागतो शेतमाल

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात धानपिकासोबतच कापूस व मिरची पिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. धानविक्रीसाठी शासनाचे आधारभूत खरेदी केंद्र आहेत, मात्र कापूस व मिरचीसाठी असे कोणतेही केंद्र नसल्यामुळे तालुक्यातील कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांना पडत्या भावात आपला शेतमाल तेलंगणा राज्यात जाऊन विकावा लागत आहे.सिरोंचा शहर तसेच तालुक्यात मिरची व कापसाचे शासकीय आधारभूत केंद्र नाही. तसेच खासगी खरेदी केंद्र तसेच जिनिंग मिलची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी माल निघाल्यानंतर अडचणीत सापडतात. यावर्षी सिरोंंचा तालुक्या धानासोबतच बºयाच क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या वतीने येथे खासगी अथवा शासकीय कापूस खरेदी केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात कापसाचे पीक घेतले जाते. तेलंगणात अनेक खासगी केंद्र (कापूस जिनिंग मिल) आहेत. कमी अंतरावर हे केंद्र असल्याने तेलंगणातील शेतकऱ्यांना कमी वेळेत कापसाची विक्री करणे सहज शक्य होते. तसेच अपेक्षेनुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात एकही केंंद्र नसल्याने येथील शेतकºयांना आपला कापूस दलालांमार्फत तेलंगणाच्या व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. परिणामी दलाल असणारा इसम आपला कमिशन काढत असल्याने शेतकऱ्यांना अल्प भाव मिळत आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने सिरोंचा तालुक्यातही शेतकºयांच्या मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून धान, कापूस, मिरचीसह भाजीपाला पिकाच्या लागवडीच्या नवनवीन पद्धती प्रात्यक्षिकासह सांगितल्या जात आहेत. वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी कापूस, मिरची व धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत.महाविकास आघाडी सरकारने व जि.प.च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सिरोंचात कापूस खरेदी केंद्र होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.६,७२७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवडसिरोंचा तालुक्यातील शेतजमीन कापूस पिकाला पोषक असल्याने या तालुक्यात दरवर्षी कापसाचा फेरा वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सिरोंचा तालुक्यात एकूण ६ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली आहे. या तालुक्यात प्रती हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल इतक्या कापसाचे उत्पादन या भागातील शेतकरी घेत आहेत. तेलंगणामध्ये कापसाला प्रती क्विंटल ५ हजार ३०० रुपये भाव दिला जात आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात दलालांमार्फत हाच कापूस तेलंगणात पाठविला जात आहे. स्थानिकस्तरावर दलाल कापसाला क्विंटल मागे ४ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये शेतकºयांना देत आहे. शेतकºयांची ५०० ते ६०० रुपयांनी कमी भाव मिळत आहे. सिरोंचात आधारभूत केंद्र असते तर शेतकऱ्यांना ५ हजार ५०० रूपयापर्यंत कापसाला भाव मिळाला असता. मात्र आधारभूत केंद्र नसल्याने कापूस उत्पादकांची लूट होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी