ओबीसी महामोर्चाला कोरोनाने लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST2021-02-21T05:09:56+5:302021-02-21T05:09:56+5:30

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी राेजी माेर्चा ...

Corona puts a break on the OBC campaign | ओबीसी महामोर्चाला कोरोनाने लावला ब्रेक

ओबीसी महामोर्चाला कोरोनाने लावला ब्रेक

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी राेजी माेर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. माेर्चाच्या माध्यमातून सरकारला ओबीसींची ताकद दाखवायची असल्याने माेर्चाला लाखांच्या जवळपास नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता होती. त्यासाठी मागील एक महिन्यापासून तयारी सुरू हाेती. गावागावांत बैठका घेतल्या जात हाेत्या. ओबीसी समाजासाेबतच इतरही समाज संघटनांनी या माेर्चाला पाठिंबा दर्शविल्याने माेर्चाची ताकद आणखी वाढली. बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, क्रीडामंत्री सुनील केदार, काॅंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, खा. अशोक नेते, चंद्रपूरचे खासदार बाळू धानाेरकर, आ. प्रतिभा धानाेरकर, आ. कृष्णा गजबे आदी अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शवून माेर्चात सहभागी हाेण्याचे आश्वासन दिले हाेते.

एकीकडे माेर्चाची तयारी जाेरात सुरू असताना दुसरीकडे काेराेनाचे रुग्णही वाढत आहेत. सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या ५९ वर पाेहाेचली आहे. काेराेनाचे नवीन बाधित प्रामुख्याने गडचिराेली शहरातच आढळून येत आहेत. त्यामुळे माेर्चासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काेराेना प्रतिबंधाचे नियम पाळून माेर्चा काढला जाईल, असे आयाेजकांकडून सांगितले जात असले, तरी हजाराेंच्या संख्येत माेर्चेकरी सहभागी हाेणार असल्याने नियम पाळणे अशक्य असल्याची जाणीव आयाेजकांना झाली. त्यामुळे माेर्चा काढावा की नाही याबाबत संदिग्धता वाढत चालली हाेती.

माेर्चाला जिल्हाभरातून समाजबांधव आणण्याची जबाबदारी तालुकास्तरावरील समन्वय समित्यांवर साेपविली हाेती. त्यामुळे माेर्चाबाबत निर्णय घेताना त्यांचेही मत विश्वासात घेणे आवश्यक हाेते. त्यांनी कळविलेल्या निर्णयावरून माेर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने शनिवारी रात्री घेतला.

बाॅक्स

माेर्चाबाबत हे आहेत वेगवेगळे मतप्रवाह

ज्या गडचिराेली शहरात माेर्चा निघणार आहे, त्याच शहरात मागील आठ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. माेर्चामुळे काेराेनाचा उद्रेक झाल्यास याचे खापर आयाेजकांवर फोडले जाण्याची शक्यता होती. दि.२२ ला माेर्चा काढल्यानंतर ओबीसींच्या मागण्या दुसऱ्याच दिवशी पूर्ण हाेतील असे नाही. त्यासाठी अनेक दिवस लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता घिसाडघाई करण्यात काहीच अर्थ नाही. माेर्चा पुढेही काढता येईल, पण काेणाच्याही आरोग्याशी खेळणे योग्य नाही, असा एक मतप्रवाह पुढे आला. मागील महिनाभरापासून माेर्चाची तयारी सुरू आहे. शेवटच्या गावापर्यंत जागृती करण्यात आल्याने नागरिक काेराेनालाही न घाबरता माेर्चात सहभागी हाेण्यास तयार हाेते. त्या नागरिकांचा मात्र हिरमाेड हाेईल, असे काहींचे मत आहे.

Web Title: Corona puts a break on the OBC campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.