पतीने साथ सोडल्याने प्रेमविवाह केलेल्या तरुणीची वाताहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:10 IST2021-02-06T05:10:09+5:302021-02-06T05:10:09+5:30
वारंवार फोन केल्यानंतरही पतीने फोन उचलला नाही. उलट तू त्याचा नाद सोड, असे सासरच्या लोकांनी तिला सांगितले. काही दिवसांनंतर ...

पतीने साथ सोडल्याने प्रेमविवाह केलेल्या तरुणीची वाताहात
वारंवार फोन केल्यानंतरही पतीने फोन उचलला नाही. उलट तू त्याचा नाद सोड, असे सासरच्या लोकांनी तिला सांगितले. काही दिवसांनंतर ती पतीला भेटायला गेली असता तिला शिवीगाळ करत भांडण केले. एवढेच नाही तर पैशाची मागणी केली, असाही आरोपी पायलने केला आहे. हे प्रकरण पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षातही गेले. पण, तिथेही त्यांच्यात समेट घडून आला नाही. अखेर पायलने चामोर्शी पोलिसांत तक्रार दिली. पण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची व्यथा तिने मांडली.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांना विचारले असता, पायलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची सूचना चामोर्शी पोलिसांना केली आहे. परंतु, पायल तिचे म्हणणे मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली नसल्यामुळे पोलीस कारवाई होऊ शकलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.