कोरोनाच्या दहशतीतही वीज कर्मचाऱ्यांची अविरत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:01:23+5:30

मानवी साखळी तोडून कोरोनाचा प्रसार थांबविण्यास केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश जनता घरीच बसून आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असल्याने दहशत निर्माण झाली आहे. अशा दहशतीच्या कालावधीतही वीज कर्मचारी स्वत:ला वाहून घेत आहेत.

Continuous service to power workers even in the horrors of Corona | कोरोनाच्या दहशतीतही वीज कर्मचाऱ्यांची अविरत सेवा

कोरोनाच्या दहशतीतही वीज कर्मचाऱ्यांची अविरत सेवा

ठळक मुद्देकौतुकास्पद कार्य : कारोनाविरूद्धच्या लढाईत देत आहेत २४ तास सहभाग

अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : मानवी साखळी तोडून कोरोनाचा प्रसार थांबविण्यास केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश जनता घरीच बसून आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असल्याने दहशत निर्माण झाली आहे. अशा दहशतीच्या कालावधीतही वीज कर्मचारी स्वत:ला वाहून घेत आहेत. त्यामुळेच घरातील सर्व वीज उपकरणे व्यवस्थित सुरू आहेत. परिणामी लॉकडाऊनच्या कालावधीत स्वत:ला बंदिस्त करून घेणे नागरिकांना शक्य झाले आहे. कोरोनाविरोधातच्या लढाईत वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांचेही महत्त्वाचे कार्य आहे, हे विसरून चालणार नाही.
क्षणभरही वीज पुरवठा खंडीत झाल्यास ग्राहकांचा जीव कासावीस होते आणि थोडावेळ वीज आली नाही तर मनाचा संयम सुटतो. यावरून जीवनात वीज किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्या अत्यावश्यक सेवांची यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे. त्यामध्ये वीज विभागाचाही समावेश आहे. ऊन, थंडी, वादळवारा, पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींची तमा न बाळगता वीज पुरवठा सुरळीत राहिल्यास यासाठी वीज कर्मचारी अविरत काम करत राहतात.
कोरोनाविरोधात लढणाºया प्रशासकीय यंत्रणांमध्ये आरोग्य विभाग व पोलिसांचे स्थान अग्रस्थानी आहे. मात्र वीज कर्मचाºयाच्याही कामाला दुर्लक्षित करून चालणार नाही. अंधारातही वीज दुरूस्तीचे काम करून सर्वांना प्रकाश देण्याचा प्रयत्न वीज कर्मचारी करत आहे. त्याच्याही कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. जेणे करून त्यालाही उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.
देसाईगंज तालुक्यात घरगुती व वाणिज्य असे एकूण १६ हजार ग्राहक आहेत. त्यातील ८ हजार ७०० ग्राहक ग्रामीण भागातील आहेत. देसाईगंज आणि शंकरपूर येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून विसोरा, एकलपूर, शंकरपूर, कसारीसह एकूण १७ ग्रामपंचायतींना वीज पुरवठा होते. तालुक्यातील सर्वच कर्मचारी व अधिकारी खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याने लॉकडाऊनच्या कालावधीतही नियमित वीज पुरवठा सुरू आहे.

जिल्हाभरात दोन लाख ग्राहकांना सेवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख १२ हजार ७५४ वीज ग्राहक आहेत. यामध्ये १ लाख ९९ हजार ६३२ घरगुती ग्राहक, ८ हजार ९१६ वाणिज्य, १ हजार ४४८ औद्योगिक, २ हजार ३९४ सार्वजनिक, ३१२ सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व ५२ उच्चदाब ग्राहक आहेत. यातील वाणिज्य व औद्योगिक ग्राहक वगळले तर घरगुती व सार्वजनिक ग्राहकांना वीज सेवा सुरू आहे. यासाठी एकूण ५७१ वीज कर्मचारी स्वत:ला वाहून घेत आहेत.

Web Title: Continuous service to power workers even in the horrors of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.