शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मृत गाईंच्या आकड्यात गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 5:00 AM

गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे उर्वरित २३९ गायींपैकी नेमक्या किती गाई मरण पावल्या याचा आकडा अजूनही गुलदस्त्यात आहे. यात बºयाच गायी मरण पावल्याचा देखावा करून प्रत्यक्षात त्या तेथून लांबवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकेवळ सात गाईंचे शवविच्छेदन : मरण पावल्याच्या नावावर परस्पर विकल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गाईंपैकी दोन महिन्यात तब्बल २४६ गाई गायब झाल्या आहेत. त्यापैकी काही गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे उर्वरित २३९ गायींपैकी नेमक्या किती गाई मरण पावल्या याचा आकडा अजूनही गुलदस्त्यात आहे. यात बºयाच गायी मरण पावल्याचा देखावा करून प्रत्यक्षात त्या तेथून लांबवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीला पुण्यावरून ३८३ गायी-वासरे मिळाली होती. वाहतुकीदरम्यान त्यातील १५ गायी आणि १६ वासरे मरण पावली. दि.१२ ते १४ ऑक्टोबर यादरम्यान त्या गायी आरमोरीत दाखल झाल्या, त्यावैळी ३५२ गाई-वासरे जिवंत होती. १४ डिसेंबरला जनावरांची मोजणी केली त्यावेळी २७६ गाई आणि १० वासरे अशी २८६ जनावरे जिवंत होती. त्यानंतर दि.२४ डिसेंबरला शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष गाई ताब्यात घेतल्या त्यावेळी केवळ १०६ गाई उपलब्ध होत्या.आरमोरीत जिवंत आणण्यात आलेल्या ३५२ गाईंपैकी केवळ १०६ गायी उपलब्ध झाल्यामुळे उर्वरित २४६ गायींचे नेमके काय झाले? हे जाणून घेणे शेतकऱ्यांसोबतच प्रशासनासाठीही महत्त्वाचे झाले आहे. मात्र याबाबत आरमोरीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.किशोर पराते यांना विचारले असता दोन दिवसांपूर्वीपर्यंत आपण ७ गाईंचे शवविच्छेदन केले असल्याचे ते म्हणाले. उर्वरित मृत गाईंचे शवविच्छेदन का झाले नाही? असे विचारले असता गाई मरण पावल्याची माहिती आपल्याला कंपनीकडून दिलीच जात नव्हती, तिथे काम करणारे लोक दोन दिवसांनंतर गाई मरण पावल्याचे सांगत होते. त्यामुळे त्या गायींची आधीच परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याने शवविच्छेदन होऊ शकले नसल्याचे डॉ.पराते म्हणाले.वास्तविक हा सर्व प्रकार संशयास्पद असून गायी खरोखर किती मेल्या आणि किती गायब केल्या गेल्या (विकल्या) याची सखोल चौकशी करावी आणि ही गडबड करणाºयांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली जात आहे.दरम्यान जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर कंपनीने विकलेल्या काही गाई परत आणण्यात आल्या आहेत.लाखोंच्या गाईंची किंमत कोणाकडून वसूल करणार?लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायींची किंमत शासनाच्या नोंदी प्रतिगाय ४० हजार रुपये असली तरी प्रत्यक्षात ती गाय ५० ते ६० हजार रुपये किमतीची आहे. परंतू जवळजवळ फुकटात मिळालेल्या कोटीच्या घरातील गायींची प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने योग्य देखभाल केलीच नाही. त्यांना ठेवण्यासाठी शेडही बनविले नाही. खाण्यास योग्य प्रकारे चाराही दिला नाही. परिणामी अनेक गायी मरण पावल्या. लाखो रुपये किमतीच्या या शासनाच्या गायी मरण्यासाठी आणि त्यांच्या गायब होण्यासाठी जबाबदार धरून त्या गायींची किंमत प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीकडून वसूल करणार का? किंवा त्या कंपनीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशिर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कुपोषणामुळेच गाईंचे मरणज्या गाई मरण पावल्या त्या कुपोषणामुळेच मरण पावल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ कंपनीने त्यांची योग्य देखभाल केली नाही हे स्पष्ट आहे. गाई शेतकºयांच्या ताब्यात देण्याच्या आधीच मरण पावणे किंवा गायब होणे यासाठी सर्वस्वी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच जबाबदार असल्याने त्या कंपनीवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :cowगाय