५० लाखांचे विमा संरक्षण दिल्याशिवाय स्वस्त धान्य वितरित करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:44+5:302021-04-20T04:37:44+5:30
स्वस्त धान्य दुकानदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व अर्थ विभागाचे प्रधान ...

५० लाखांचे विमा संरक्षण दिल्याशिवाय स्वस्त धान्य वितरित करणार नाही
स्वस्त धान्य दुकानदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व अर्थ विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन पाठविले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नुकतेच राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना तसेच पत्रकारांना ५० लाखांचे विमा संरक्षण जाहीर केले. ही बाब स्वस्त धान्य दुकानदारांसाठी चांगली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत इतर अपेक्षा न ठेवता धान्य दुकानदार अविरतपणे सेवा देत आहेत. याची जाणीव सरकारने ठेवणे गरजेचे आहे. राजस्थानसारखे राज्य जर ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देत असेल, तर देशामध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्र का देऊ शकत नाही? स्वस्त धान्य दुकानदारांचे काही बरे-वाईट झाले, तर त्यांचा संपूर्ण परिवार रस्त्यावर येईल, याची जाणीव सरकारने ठेवून स्वस्त धान्य दुकानदारांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे अन्यथा धान्य वाटप बंद केले जाईल, असा इशारा गडचिरोली स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दिला आहे.