शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:21 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात दिवाळीपूर्वी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात धान खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. दरम्यान आपली आर्थिक अडचण भागविण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळी खासगी व्यापाऱ्याला आपला धान विकला.

ठळक मुद्देसातबाराचा सर्रास वापर : शेतकऱ्यांच्या नावावर धान विकलेल्या व्यापाऱ्यांना हवा बोनसचा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात दिवाळीपूर्वी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात धान खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. दरम्यान आपली आर्थिक अडचण भागविण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळी खासगी व्यापाऱ्याला आपला धान विकला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान दोन महिन्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाराचा वापर करून आविका संस्थेच्या केंद्रांवर विकला. आता बोनसच्या रकमेवरून व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये कलगीतुरा निर्माण झाला आहे. तो धान आम्ही विकल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमा होणारे बोनस आम्हाला द्यावे अशी अपेक्षा व्यापारी करीत आहेत.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आविका संस्थांमार्फत दरवर्षी आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. हंगामाच्या सुरूवातीला महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्र प्रस्तावित केले जातात. दरम्यान धान केंद्र मंजूर करण्याची प्रशासकीय कार्यवाही पार पडण्यास विलंब होतो. परिणामी महामंडळाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यास दोन महिन्याचा विलंब होत असतो. नेमक्या याच काळात अल्पमुदतीच्या धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळी मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना आपला धान विकून टाकला. आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केल्यास संबंधित शेतकऱ्याला क्विंटलमागे २०० रुपयांचा बोनस मिळत असतो. मात्र विद्यमान राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वी बोनसच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस आता दिला जात आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा वापरून आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केली. या धानाचा बोनस वाढीव रकमेनुसार संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. व्यापाऱ्याकडे धान विक्री केल्याने आपले आर्थिक नुकसान झाले, ही बाब लक्षात आल्यावर अनेक शेतकरी व्यापाऱ्यांकडे बोनसच्या वाढीव रकमेसाठी तगादा लावत आहेत. विशेष म्हणजे, अनेक खासगी व्यापाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याचा सातबारा वापरून दोन महिन्याच्या अंतराने महामंडळाच्या केंद्रावर साठा केलेल्या धानाची विक्री केली.वाढीव रकमेवर शेतकऱ्यांचाच हक्कबोनसच्या स्वरूपात धानावर क्विंटलमागे मिळालेले वाढीव ३०० रुपयावर आमचा हक्क आहे, तो तुम्हाला देणार नाही, असा प्रस्ताव अनेक शेतकरी संबंधित व्यापाऱ्यांकडे ठेवत आहेत. सदर रक्कम न मिळाल्यास आमच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम विड्रॉल करून देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे. या वादामुळे अनेक व्यापाऱ्यांची आता गोची झाली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड