शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:21 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात दिवाळीपूर्वी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात धान खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. दरम्यान आपली आर्थिक अडचण भागविण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळी खासगी व्यापाऱ्याला आपला धान विकला.

ठळक मुद्देसातबाराचा सर्रास वापर : शेतकऱ्यांच्या नावावर धान विकलेल्या व्यापाऱ्यांना हवा बोनसचा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात दिवाळीपूर्वी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात धान खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. दरम्यान आपली आर्थिक अडचण भागविण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळी खासगी व्यापाऱ्याला आपला धान विकला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान दोन महिन्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाराचा वापर करून आविका संस्थेच्या केंद्रांवर विकला. आता बोनसच्या रकमेवरून व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये कलगीतुरा निर्माण झाला आहे. तो धान आम्ही विकल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमा होणारे बोनस आम्हाला द्यावे अशी अपेक्षा व्यापारी करीत आहेत.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आविका संस्थांमार्फत दरवर्षी आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. हंगामाच्या सुरूवातीला महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्र प्रस्तावित केले जातात. दरम्यान धान केंद्र मंजूर करण्याची प्रशासकीय कार्यवाही पार पडण्यास विलंब होतो. परिणामी महामंडळाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यास दोन महिन्याचा विलंब होत असतो. नेमक्या याच काळात अल्पमुदतीच्या धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळी मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना आपला धान विकून टाकला. आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केल्यास संबंधित शेतकऱ्याला क्विंटलमागे २०० रुपयांचा बोनस मिळत असतो. मात्र विद्यमान राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वी बोनसच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस आता दिला जात आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा वापरून आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केली. या धानाचा बोनस वाढीव रकमेनुसार संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. व्यापाऱ्याकडे धान विक्री केल्याने आपले आर्थिक नुकसान झाले, ही बाब लक्षात आल्यावर अनेक शेतकरी व्यापाऱ्यांकडे बोनसच्या वाढीव रकमेसाठी तगादा लावत आहेत. विशेष म्हणजे, अनेक खासगी व्यापाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याचा सातबारा वापरून दोन महिन्याच्या अंतराने महामंडळाच्या केंद्रावर साठा केलेल्या धानाची विक्री केली.वाढीव रकमेवर शेतकऱ्यांचाच हक्कबोनसच्या स्वरूपात धानावर क्विंटलमागे मिळालेले वाढीव ३०० रुपयावर आमचा हक्क आहे, तो तुम्हाला देणार नाही, असा प्रस्ताव अनेक शेतकरी संबंधित व्यापाऱ्यांकडे ठेवत आहेत. सदर रक्कम न मिळाल्यास आमच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम विड्रॉल करून देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे. या वादामुळे अनेक व्यापाऱ्यांची आता गोची झाली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड