बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:19+5:30
आपल्या जीवनात काहीतरी बनायचे असेल तर बौद्ध बांधवांनी दान करावे, दान करणाऱ्या व्यक्तीकडे चांगले गुण असतात. जो शीलचे पालन करतो, त्याला समाधीचा अभ्यास प्राप्त होऊन त्याच्या अंगी प्रज्ञा जागते, असे प्रतिपादन भन्ते शांतरक्षित महाथेरो यांनी सांगितले.

बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : सिद्धार्थ गौतम बुद्धाने संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग सांगितला. आज हा मार्ग स्विकारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे, असे प्रतिपादन भन्ते भगीरथ यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील घोटपासून १८ किमी अंतरावर असलेल्या कोठरी जंगल परिसरात अरण्यवास बौद्ध विहारात ३० आॅक्टोबर रोजी वर्षावास समापन सोहळा पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भन्ते सदानंद महाथेरो, भन्ते शांतरक्षित महाथेरो, प्रज्ञाशील महाथेरो, विनय रक्षित, नागरिपंकर, शामनेर रूपजोती, भन्ते सुबोध, प्रज्ञानंद, सूर्याज्योती, आर्यसूत थेरो, श्रद्धारक्षित थेरो, धम्मशील थेरो, सुमंगल बोधी महास्थवीर, धम्मबोधी स्थवीर, धम्मरक्षित, अमर ज्योती, सत्यशीला, शांतीशीला, श्रमणेरी पुन्नीका आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या जीवनात काहीतरी बनायचे असेल तर बौद्ध बांधवांनी दान करावे, दान करणाऱ्या व्यक्तीकडे चांगले गुण असतात. जो शीलचे पालन करतो, त्याला समाधीचा अभ्यास प्राप्त होऊन त्याच्या अंगी प्रज्ञा जागते, असे प्रतिपादन भन्ते शांतरक्षित महाथेरो यांनी सांगितले. सदर वर्षावास समापन सोहळ्याला गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागातील बौद्ध उपासक व उपासिकांनी हजारोच्या संख्येने हजेरी लावली होती. पुस्तकांच्या स्टॉलसही विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.
कोठरी बुद्ध विहाराला ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र सोयीसुविधा करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.