शेतकऱ्यांचे समर्थनात बीआरएसपीचे धरणे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:41+5:302021-01-14T04:30:41+5:30
भांडवलदारांचे हित जाेपासण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविराेधी तीन कायदे पारित केले. या कायद्यांविराेधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये राेष आहे. कायदे रद्द करावे, ...

शेतकऱ्यांचे समर्थनात बीआरएसपीचे धरणे आंदाेलन
भांडवलदारांचे हित जाेपासण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविराेधी तीन कायदे पारित केले. या कायद्यांविराेधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये राेष आहे. कायदे रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आंदाेलन करीत आहेत. ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. उत्पादित मालाला दीडपट हमी भाव, बाजारव्यवस्था व शेतकरी वादांचा निवाडा करण्याठी शेतकरी लवाद किंवा किसान काेर्ट स्थापन करणे आदी मागण्यांसह अन्य मागण्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. परंतु शासन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे.भांडलदारांचे हित साधण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या कायद्यांमुळे महागाई वाढेल व शेतकऱ्यांची लूट हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी विराेधी तीन कायदे रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. बीआरएसपीच्या वतीने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांच्या आंदाेलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे देण्यात आली. आंदाेलन करताना प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हाध्यक्ष
राज बन्सोड, जिल्हाप्रभारी सदाशिव निमगडे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, जिल्हाकाेषाध्यक्ष
मिलिंद बांबोळे, गडचिराेली तालुकाध्यक्ष दीपक बोलीवार, उपाध्यक्ष महेश टिपले, जितेंद्र बांबोळे, संघरक्षित बांबोळे, प्रफुल रायपुरे, धम्मदीप बारसागडे, सतीश दुर्गमवार, बंटी दहिवले, धनंजय बांबोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते.