भाजपलाही अनपेक्षित मिळाला विजय
By Admin | Updated: May 17, 2014 00:14 IST2014-05-17T00:14:15+5:302014-05-17T00:14:15+5:30
१0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला गडचिरोली-चिमूर मतदार संघातून विजय मिळेल, अशी पूर्ण आशा होती. मात्र हा विजय २ लाख ३६ हजार ९७0 मतांचा असेल

भाजपलाही अनपेक्षित मिळाला विजय
गडचिरोली : १0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला गडचिरोली-चिमूर मतदार संघातून विजय मिळेल, अशी पूर्ण आशा होती. मात्र हा विजय २ लाख ३६ हजार ९७0 मतांचा असेल, हे मात्र अपेक्षीत नव्हते. हा विजय लाखाच्या फरकाने होईल, असा सट्टाबाजारासह राजकीय क्षेत्रातील विविध पक्षाच्या जाणकारांचा अंदाज होता. गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात भाजपला प्रत्येकी ३0 हजाराची आघाडी मिळेल व जिल्ह्याबाहेरील मतदार संघात किमान ५ ते १0 हजाराचे मताधिक्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात राहिल, असे जाणकार मानत होते. त्यामुळे भाजपच्या व काँग्रेसच्या विजयाचा अंतर हे सव्वालाखाच्या आसपास अंतरावर राहिल, हे मात्र अनेकांना वाटत होते. परंतु आज पहिल्या फेरीपासूनच मतमोजणीला सुरूवात झाल्यावर अशोक नेते यांच्या विजयाचा झंझावात सुरू झाला. पहिल्या फेरीत ११ हजार ८३९, दुसर्या फेरीत २0 हजार ७३६, तिसर्या फेरीत ३३ हजार ९७७ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर ही आघाडी प्रत्येक फेरीत ५ ते १0 हजाराच्या फरकात चालत राहिली. कुठल्याही फेरीत काँग्रेस उमेदवार आघाडी घेऊ शकले नाही. काँग्रेसलाही निवडणुकीच्या मतदानानंतर गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघांमध्ये आपल्याला आघाडी राहणार नाही, याची जाणीव झालेली होती. मात्र चिमूर आणि आमगाव या दोन विधानसभा क्षेत्रात आपण निश्चितपणे आघाडी घेऊ, अशी अपेक्षा होती. मात्र गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपने ६९ हजार मतांची घेतलेली आघाडी काँग्रेसला प्रचंड फटका देणारी ठरली. या ठिकाणी भाजपला मिळालेला कौल हा काँग्रेससाठी सर्वात मोठा दणका होता व या कौलामुळे भाजपला २ लाखापर्यंतच्या मताधिक्याची मजल गाठता आली. गडचिरोली जिल्ह्यात आजवरच्या मोठय़ा निवडणुकांमधला हा मताधिक्याचा उच्चांक आहे. पुर्णत: आदिवासीबहुल नसलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गैर आदिवासी मतदारांनी या निवडणुकीत काँग्रेसकडे पूर्ण पाठ फिरविल्याने हा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक ठरला. (प्रतिनिधी)