भामरागडातील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: February 24, 2016 01:14 IST2016-02-24T01:14:54+5:302016-02-24T01:14:54+5:30
भामरागड शहराच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने सोमवारपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.

भामरागडातील अतिक्रमण हटविले
विश्वेश्वरराव चौक केला मोकळा : दोन महिन्यात शहराचा चेहरा बदलणार
भामरागड : भामरागड शहराच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने सोमवारपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.
त्यांतर्गत पहिल्या दिवशी पर्लकोटा नदीपासून राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले. या कामी तीन जेसीबी व दहा ट्रॅक्टर लावण्यात आले होते. अतिक्रमण हटविल्यानंतर निघालेला मलबा रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात आला. अतिक्रमण काढताना चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक व्यावसायिकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढून विश्वेश्वरराव चौकापर्यंतचा रस्ता मोकळा करून दिला. नगर पंचायत झाल्यानंतर आता या कामाला अतिक्रमण काढून गती मिळेल, अशी आशा आहे. येत्या दोन महिन्यात भामरागडचा चेहरा, मोहरा बदलवू असे नगराध्यक्ष राजू वड्डे, बांधकाम सभापती हरिभाऊ रापेल्लीवार, प्रशासक परसे यांनी लोकमतला सांगितले.
रखडलेले काम लागेल आता मार्गी
गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण रखडले होते. तसेच पर्लकोटा नदीपासून बबलू मेडिकल समूह निवासी शाळेपर्यंत दोन्ही बाजुच्या नाली बांधकाम करण्यात आले. तेथून पोलीस स्टेशनपर्यंत नाली बांधकाम रखडले. त्यानंतर विश्वेश्वर चौकातून टोलाकडे जाणाऱ्या मार्गावर कलवट न बांधल्याने समूह निवासी शाळेचे सांडपाणी चौकात वाहत होते.