शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

वीज नसतानाही पाठविले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 1:04 AM

अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे.

ठळक मुद्देयेरमनार परिसरातील पाच गावे : आलापल्ली वीज कार्यालयावर ग्राहकांची धडक

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरूवारी आलापल्ली येथील वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.अहेरी तालुकातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोरेपल्ली, कवटाराम व मिचगुंडा आणि आरेंदा ग्रामपंचायतमधील ताडगुडा व चौडमपल्ली आदी पाच गावांत वीज पुरवठा अद्यापही सुरू करण्यात आला नाही. विशेष म्हणजे पाचही गावांमध्ये यंदाच्या मे महिन्यात विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही एक दिवस सुद्धा वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. वीज पुरवठा नसतानाही ग्राहकांना वीज देयके पाठविले जात आहेत. महावितरण कंपनीकडून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीच्या सुमारास अंधारात रस्त्याने फिरणाºया नागरिकांना सरपटणाºया प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, आरेंदाचे उपसरपंच राजू तलांडी तसेच कोरेपल्ली, कवटाराम, मिचगुंडा, ताडगुडा व चौडमपल्लीतील नागरिक हजर होते.ट्रान्सफॉर्मर पडला बंदयेरमनार व आरेंदा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया गावांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफार्मर लावून तो सुरू करण्यात आला. परंतु वीज पुरवठा गावांमध्ये सुरळीत करण्यात आला नाही. वीज पुरवठा सुरू करण्याआधीच ट्रान्सफार्मर बंद पडले. ताडगुडा येथील अनेक नागरिकांच्या घरी वीज मीटरही बसविण्यात आले नाही. परंतु वीज पोहोचली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विजेची अद्यापही प्रतीक्षा आहे. महावितरण कंपनीच्या एकूणच कारभारावर परिसरातील नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :electricityवीज