शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

७१ हजार शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:07 IST

जमिनीतील घटकद्रव्यानुसार पिकांची निवड व खतांची मात्रा ठरवावी लागते. जमिनीत कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या शेतजमिनीची चाचणी करून त्यामध्ये कोणते घटकद्रव्य आहेत, याबाबतचा उल्लेख असलेली आरोग्य पत्रिका वितरित करण्याची योजना आखली आहे.

ठळक मुद्देपिकांमध्ये बदल करणार? : शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जमिनीतील घटकद्रव्यानुसार पिकांची निवड व खतांची मात्रा ठरवावी लागते. जमिनीत कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची चाचणी करून त्यामध्ये कोणते घटकद्रव्य आहेत, याबाबतचा उल्लेख असलेली आरोग्य पत्रिका वितरित करण्याची योजना आखली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ७१ हजार ८२५ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे.जमिनीमध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद, पालाश, लोह, जस्त आदी मूलद्रव्य आढळून येतात. प्रत्येक जमिनीमध्ये याचे प्रमाण कमीजास्त राहते. त्यावरून मातीचा प्रकार ठरविल्या जातो. तसेच या मातीवरून पिकांची निवड केली जाते. मातीची चाचणी करण्याची माहिती शेतकऱ्यांना राहत नाही. त्यामुळे शेतकरी मातीची चाचणी करून घेत नाही. परिसरातील शेतकरी ज्या पिकांची लागवड करतात, तेच पीक घेतात. मात्र काही किलोमीटर अंतरावर मातीचा दर्जा बदलतो. त्यानुसार पिकामध्ये बदल करणे आवश्यक आहे.पिकांच्या वाढीच्या दृष्टीने नत्र, स्फुरद, पालाश, लोक, जस्त ही घटकद्रव्ये महत्त्वाची आहेत. मृदा सर्वेक्षण व चाचणी करतेवेळी याच घटकांचे प्रमाण तपासले जाते. २०१८-१९ या वर्षात २१ हजार ४ सर्वसाधारण मृदा नमूने व २१ हजार ४ सूक्ष्म नमूने असे एकूण ४२ हजार ८ नमूने तपासण्यात आले. त्या आधारे परिसरातील ७१ हजार ८२५ शेतकºयांना जमिनीच्या आरोग्यपत्रिकांचे वितरण करण्यात आले. जवळपास २० ते २५ हेक्टरसाठी एक नमुना घेतला जातो. तेवढ्या परिसरात जेवढ्या शेतकºयांच्या शेतजमिनी येतात, त्या शेतकºयांना आरोग्य पत्रिकेचे वितरण केले जाते. या आरोग्य पत्रिकेवर संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये नेमके कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती होण्यास मदत होते.आरोग्यपत्रिकेवर राहतो सल्लामृदेचे सर्वेक्षण व चाचणी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत नेमके कोणते घटकद्रव्य आहेत, याची माहिती दिली जाते. तसेच या घटकद्रव्यानुसार कोणत्या बिटांची लागवड करावी, शेतजमिनीत कोणत्या घटकद्रव्याचे प्रमाण अधिक आहे. कोणती घटकद्रव्य रासायनिक खतांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात देणे आवश्यक आहे, याची माहिती आरोग्य पत्रिकेवर दिली राहते. त्यामुळे सदर आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक पत्रिका म्हणून काम करते. शासनाला आरोग्य पत्रिकेचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असल्याने संपूर्ण राज्यात ही योजना राबविली जात आहे.आरोग्य पत्रिकेनुसार पिकांची निवडच नाहीजमिनीत असलेल्या घटकद्रव्यानुसार पिकांची निवड व खतांच्या मात्रा देणे आवश्यक आहे. यासाठीच आरोग्य पत्रिका दिली जाते. शासन मृदा सर्वेक्षण व चाचणीसाठी या मृदा सर्वेक्षण विभागाला निधी उपलब्ध करून देते. त्यामुळे कृषी विभागाच्या मदतीने मृदेचे सर्वेक्षण व चाचणी करून संबंधित शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकांचे वितरण केले जाते. मात्र कोणत्या पिकासाठी जमीन योग्य आहे, याबाबत कृषी सहायक कोणतेही मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे आरोग्य पत्रिका हे एक केवळ कागद म्हणून शेतकऱ्याकडे शिल्लक राहते.

टॅग्स :Healthआरोग्यFarmerशेतकरी