शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

३३५ कक्षांमध्ये बांबू कटाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:16 IST

जिल्ह्यातील ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू कटाई योग्य झाला आहे. या माध्यमातून पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१३ गावांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कटाईयोग्य बांबूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बांबूतून मिळणारे ग्रामसभांचे उत्पन्न गेल्यावर्षीपेक्षा घटणार आहे.

ठळक मुद्दे२१३ गावांना रोजगार : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात येणार घट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू कटाई योग्य झाला आहे. या माध्यमातून पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१३ गावांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कटाईयोग्य बांबूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बांबूतून मिळणारे ग्रामसभांचे उत्पन्न गेल्यावर्षीपेक्षा घटणार आहे.जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे. त्यामुळे तेंदूनंतर सर्वाधिक रोजगार बांबूच्या माध्यमातून उपलब्ध होतो. त्यामुळे बांबू कटाईच्या कामाची नागरिक प्रतीक्षा करीत राहतात. दर तीन वर्षांनी बांबू कटाईसाठी परिपक्व होतो. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ५०० कम्पार्टमेंटमध्ये बांबू आढळून येतो.मागील वर्षी २४४ गावांनी ३७१ कम्पार्टमेंटमध्ये बांबूची तोड केली होती. बांबू तोडून थेट व्यापाºयाला विकला जातो. त्यामुळे यातून ग्रामसभांना नगदी पैसा उपलब्ध होतो. यावर्षी २१३ गावांच्या सिमेंतर्गत येणाºया ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू परिपक्व झाला असल्याने तो तोडण्याची परवानगी वनविभागाने ग्रामसभांना दिली आहे.ग्रामसभांना बांबू कटाईचे अधिकार दिले असले तरी बांबू परिपक्व झाला किंवा नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी वन विभागाकडे आहे. मोठ्या प्रमाणात बांबूची तोड होऊन बांबूचे झाड पूर्णपणे नष्ट होणे हा या मागील उद्देश आहे. तेंदूप्रमाणेच बांबूमध्येही पर्याय २ व पर्याय १ निवडण्याची सुविधा ग्रामसभांना दिली आहे. मात्र बांबूच्या माध्यमातून गावातील नागरिकांना जवळपास चार ते सहा महिने रोजगार उपलब्ध होते. तसेच थेट पैसा ग्रामसभेला उपलब्ध होते.बांबू खरेदी करणारे व्यापारी गावातच येतात. या सर्व सुविधांमुळे ग्रामसभा पर्याय २ ची निवड करून बांबू कटाई स्वत:च करतात. यातून ग्रामसभांना कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते.रांझी नष्ट होण्याच्या मार्गावरबांबूची कटाई करताना ती व्यवस्थित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परिपक्व झालेला बांबूच तोडणे आवश्यक आहे. मात्र काही ग्रामसभा लालसेपोटी परिपक्व न झालेलाही बांबू तोडत आहेत. संपूर्ण रांझीच नष्ट केली जात आहे. त्यामुळे नवीन रोपटे तयार होत नाही. परिणामी काही दिवसातच बांबूची रांझी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवीन येणाºया फुटव्याला आधारासाठी जुने झाड काही प्रमाणात शिल्लक राहणे आवश्यक आहे. मात्र एकही रांझी शिल्लक राहत नसल्याने नवीन फुटवा वाकतो व तो निकामी होतो. याकडे वन विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन बांबू कटाईचे नियम धुडकाविणाºया ग्रामसभांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग