शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

३३५ कक्षांमध्ये बांबू कटाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:16 IST

जिल्ह्यातील ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू कटाई योग्य झाला आहे. या माध्यमातून पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१३ गावांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कटाईयोग्य बांबूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बांबूतून मिळणारे ग्रामसभांचे उत्पन्न गेल्यावर्षीपेक्षा घटणार आहे.

ठळक मुद्दे२१३ गावांना रोजगार : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात येणार घट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू कटाई योग्य झाला आहे. या माध्यमातून पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या २१३ गावांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कटाईयोग्य बांबूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बांबूतून मिळणारे ग्रामसभांचे उत्पन्न गेल्यावर्षीपेक्षा घटणार आहे.जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे. त्यामुळे तेंदूनंतर सर्वाधिक रोजगार बांबूच्या माध्यमातून उपलब्ध होतो. त्यामुळे बांबू कटाईच्या कामाची नागरिक प्रतीक्षा करीत राहतात. दर तीन वर्षांनी बांबू कटाईसाठी परिपक्व होतो. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ५०० कम्पार्टमेंटमध्ये बांबू आढळून येतो.मागील वर्षी २४४ गावांनी ३७१ कम्पार्टमेंटमध्ये बांबूची तोड केली होती. बांबू तोडून थेट व्यापाºयाला विकला जातो. त्यामुळे यातून ग्रामसभांना नगदी पैसा उपलब्ध होतो. यावर्षी २१३ गावांच्या सिमेंतर्गत येणाºया ३३५ कम्पार्टमेंटमधील बांबू परिपक्व झाला असल्याने तो तोडण्याची परवानगी वनविभागाने ग्रामसभांना दिली आहे.ग्रामसभांना बांबू कटाईचे अधिकार दिले असले तरी बांबू परिपक्व झाला किंवा नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी वन विभागाकडे आहे. मोठ्या प्रमाणात बांबूची तोड होऊन बांबूचे झाड पूर्णपणे नष्ट होणे हा या मागील उद्देश आहे. तेंदूप्रमाणेच बांबूमध्येही पर्याय २ व पर्याय १ निवडण्याची सुविधा ग्रामसभांना दिली आहे. मात्र बांबूच्या माध्यमातून गावातील नागरिकांना जवळपास चार ते सहा महिने रोजगार उपलब्ध होते. तसेच थेट पैसा ग्रामसभेला उपलब्ध होते.बांबू खरेदी करणारे व्यापारी गावातच येतात. या सर्व सुविधांमुळे ग्रामसभा पर्याय २ ची निवड करून बांबू कटाई स्वत:च करतात. यातून ग्रामसभांना कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते.रांझी नष्ट होण्याच्या मार्गावरबांबूची कटाई करताना ती व्यवस्थित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परिपक्व झालेला बांबूच तोडणे आवश्यक आहे. मात्र काही ग्रामसभा लालसेपोटी परिपक्व न झालेलाही बांबू तोडत आहेत. संपूर्ण रांझीच नष्ट केली जात आहे. त्यामुळे नवीन रोपटे तयार होत नाही. परिणामी काही दिवसातच बांबूची रांझी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवीन येणाºया फुटव्याला आधारासाठी जुने झाड काही प्रमाणात शिल्लक राहणे आवश्यक आहे. मात्र एकही रांझी शिल्लक राहत नसल्याने नवीन फुटवा वाकतो व तो निकामी होतो. याकडे वन विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन बांबू कटाईचे नियम धुडकाविणाºया ग्रामसभांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग