शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

एटापल्लीत ६४ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 02:04 IST

तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांकरिता २५ तर आठ पंचायत समिती गणांकरिता ३९ उमेदवार रिंगणात आहेत.

विद्यमान पदाधिकारीही निवडणुकीत : दुर्गम भागात दुचाकीच्या माध्यमातून प्रचार रवी रामगुंडेवार   एटापल्ली तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांकरिता २५ तर आठ पंचायत समिती गणांकरिता ३९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेकरिता एटापल्ली पंचायत समितीचे विद्यमान सभापती दीपक फुलसंगे व उपसभापती संजय चरडुके तर पंचायत समितीकरिता माजी सभापती व विद्यमान सदस्य सपना कोडापे या निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उडेरा-गुरूपल्ली जिल्हा परिषद क्षेत्राची जागा नामाप्र महिलेकरिता राखीव आहे. या मतदार संघात काँग्रेसच्या मार्फत रागिणी दशरथ अडगोपुलवार, आविसच्या सारिका प्रवीण आईलवार, अपक्ष म्हणून ज्योत्सना रामजी कत्तीवार, भाजपातर्फे जिल्हा परिषदेच्या विद्यमान समाजकल्याण सभापती सुवर्णा विलास खरवडे, अपक्ष म्हणून उषा अरविंद ठाकरे, राकाँतर्फे संगीता रामरेड्डी बिरमवार, अपक्ष म्हणून सोनी गुणाजी भगत हे सात उमेदवार रिंगणात आहेत. ज्योत्स्ना कत्तीवार ही माजी जिल्हा परिषद सदस्य रामजी कत्तीवार यांची कन्या आहे. उषा ठाकरे यांनी काँग्रेसकडून तिकीट मागितले होते. मात्र काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. गट्टा-पुरसलगोंदी क्षेत्राची जागा अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. यामध्ये अपक्ष म्हणून सैनू मासू गोटा, राकाँतर्फे राजू भीमा नरोटी, काँग्रेसतर्फे नंदकुमार नाजुकराव नरोटे, दीपक कुंजीलाल फुलसंगे हे चार उमेदवार रिंगणात आहेत. आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनू गोटा हे गट्टा गावात राहून मागील दीड वर्षांपासून या परिसरातील गावागावात जाऊन पेसा कायद्याअंतर्गत सभा घेऊन आदिवासींमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत होते. सैनू गोटा न्यायालयीन कोठडीत असताना नामांकन अर्ज भरण्यात आला. सैनू गोटांची उमेदवारी कायम आहे. याच गट्टा-पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार म्हणून सैनू गोटा यांच्या पत्नी शीला गोटा यासुद्धा उभ्या आहेत. हालेवारा-गेदा क्षेत्र अनुसूचित जमाती महिलाकरिता राखीव आहे. या क्षेत्रातून भाजपातर्फे कल्पना प्रशांत आत्राम, राकाँतर्फे ज्योती चंदू कोरामी, काँग्रेसतर्फे लक्ष्मी गोगलू गावडे, अपक्ष म्हणून सुमित्रा नागेश गावडे, शिवसेनेकडून माया मंगुजी नरोटे, आविसतर्फे मनीषा भाऊजी रापंजी हे सहा उमेदवार रिंगणात आहेत. मनीषा रापंजी ही विद्यमान जि. प. सदस्य कारूजी रापंजी यांची सून आहे. जारावंडी-कसनसूर ही जागा नामाप्रकरिता राखीव असल्याने या क्षेत्रात सर्वाधिक आठ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेकडून खुशाल मारोती गावतुरे, काँग्रेसतर्फे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती संजय भाऊजी चरडुके, अपक्ष म्हणून सदाशिव देऊ जेंगठे, राकाँतर्फे ऋषीकांत लक्ष्मण पापडकर, भाजपातर्फे संजय पुरूषोत्तम पोहणेकर, बसपातर्फे रमेश आनंदराव मडावी, आविसतर्फे लहुजी फकिरा शेंडे, अपक्ष म्हणून देवनाथ रामा सोनुले हे उमेदवार रिंगणात आहेत. संजय पोहणेकर हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा पोहणेकर यांचे चिरंजीव आहेत. एटापल्ली तालुक्यातील चारही मतदार संघातील बहुतांश उमेदवार तुल्यबळ आहेत. सर्वच उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. ज्या गावांमध्ये चारचाकी वाहन जात नाही, अशा गावांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमदेवारांचे कार्यकर्ते दुचाकीच्या माध्यमातून प्रचार करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.