शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

आश्रमशाळेतील विद्यार्थी दुपारच्या सत्रात वर्गात मारतात डुलक्या; प्रभावी अध्यापन कसे होणार?

By दिलीप दहेलकर | Updated: August 13, 2023 19:56 IST

सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे.

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून नव्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रामध्ये भरत आहेत.या वेळापत्रकाची अंमलबजावणी १० जुलै २०२३ पासून सुरू झाली असून नव्या वेळापत्रकाचे परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे.

पहिली ते बारावीपर्यंतच्या आश्रमशाळेत सुमारे दोनशे ते चारशेच्या आसपास आदिवासी विद्यार्थी शिकत असतात. आश्रमशाळेतील दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोय व समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तणाव निर्माण करणाऱ्या या वेळापत्रकामुळे विद्यार्थी व कर्मचारी त्रासल्याचे दिसून येते. हे वेळापत्रक अत्यंत गैरसोयीचे असून आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. सकाळ सत्रातील पाचव्या तासिकेला विद्यार्थ्यांचे मन लागत नाही. 

इयत्ता पहिली ते सातव्या वर्गातील विद्यार्थी भुकेने व्याकुळलेले असतात. मोठे विद्यार्थी कसेबसे तग धरून राहतात पण त्यांचेही वर्गात पाहीजे तसे मन लागत नाही, ही बाब शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे. जेवणानंतर लगेच सुरु होणाऱ्या दुसऱ्या सत्रात मात्र काही विद्यार्थी अक्षरशः डुलक्या मारतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेल्या अवस्थेमध्ये वर्गात बसतात, ही वस्तुस्थिती आहे. नव्या वेळापत्रकाला आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून या पाठोपाठ आता विद्यार्थी व पालकांचाही विरोध होत असल्याचे दिसत आहे.

आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना या वेळापत्रकाला विरोध करीत आहे. सदर वेळापत्रक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांवर लादल्या गेल्याची भावना आश्रमशाळेतील कर्मचारी,विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झालेली आहे. पूर्वीचेच वेळापत्रक ठेवण्याबाबत मुख्यमंत्री ,आदिवासी विकास मंत्री यांना संघटनेने निवेदन दिलेले आहे. परंतु अजूनपर्यंत वेळापत्रक बदललेले नाही.

असे आहे आश्रमशाळेचे वेळापत्रकनव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहाटे ५.३० वाजता उठावे लागते तर रात्री ९.३० वाजता झोपेची वेळ असते. सोमवार ते शुक्रवारला पहिले शालेय सत्र सकाळी ८.४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२.३० वाजता संपते. जेवणानंतर दुसऱ्या सत्राला दुपारी १.३० वाजता सुरुवात होते व दुपारी ४.०० वाजता तासिका संपल्यानंतरही हा सत्र सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असतो. सकाळचे जेवण दुपारी १२.३० वाजता तर रात्रीचे जेवण सायंकाळी ६.३० वाजता असते. सकाळी व सायंकाळी दोन वेळेस नाश्ता असतो. शनिवारला शालेय सत्रास सकाळी ७.४५ वाजता सुरुवात होऊन ११.५० ला सुट्टी होते. शनिवारला दुपारी ३.०० ते ४.३० पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.

२३ ऑगस्टला आश्रमशाळा शिक्षकांचा एल्गारया अन्यायकारक वेळापत्रकाच्या विरोधात व अन्य मागण्यांसाठी आता आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल. कराड, राज्य कार्याध्यक्ष एस.जे.शेवाळे, राज्य सरचिटणीस प्रा.बी.टी. भामरे,नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, ठाणे विभागीय अध्यक्ष राजेश पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ.अशोक झुंझारे, नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांच्या नेतृत्वात आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे २३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली