शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

लोकसभेत आरमोरी क्षेत्र नेहमीच भाजपच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:29 AM

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेने आजपर्यंत झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने झुकते माप दिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या विधानसभा क्षेत्रात भाजपचा प्रभाव नव्हताच. अशाही परिस्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्राने लोकसभेत भाजपला सातत्याने आघाडी दिली आहे. ही परंपरा याही वेळी कायम राहिल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देशिवसेनेचा बालेकिल्ला हरवला : प्रत्येक लोकसभेला भाजपला आघाडी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेने आजपर्यंत झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने झुकते माप दिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या विधानसभा क्षेत्रात भाजपचा प्रभाव नव्हताच. अशाही परिस्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्राने लोकसभेत भाजपला सातत्याने आघाडी दिली आहे. ही परंपरा याही वेळी कायम राहिल्याचे दिसून आले.एकेकाळी आरमोरी विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आता मात्र हे विधानसभा क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. सन १९९० पासून सतत तीन वेळा या विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. सन २००४ मध्ये काँग्रेसने सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले व सतत दोन वेळा या मतदार संघाने काँग्रेसच्या उमेदवाराला संधी दिली.सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे हे निवडून आले होते. तेव्हाही या क्षेत्राने भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना १४ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी दिली होती. सन १९९६ पासून तर आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला झुकते माप देण्याची परंपरा या विधानसभा क्षेत्राने कायम राखली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांना ९० हजार ८८५ मते आरमोरी विधानसभा क्षेत्रातून मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांना ४८ हजार २०८ मते मिळाली होती. म्हणजे मोदी लाटेत २०१४ मध्ये अशोक नेते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून ४२ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती.सन २०१९ च्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून खासदार अशोक नेते यांना ८९ हजार ५११ मते मिळाली. तर काँग्रेसचे डॉ.उसेंडी यांना ७२ हजार ३६९ मते मिळाली. यावेळी भाजपची मते थोडीफार कमी झालेली दिसतात. काँग्रेस उमेदवाराला भाजपच्या तुलनेत २०१४ च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत २४ हजार पेक्षा जास्त मते मिळाल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य वाढले असले तरी भाजपचे खासदार अशोक नेते यांना १७ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी या क्षेत्रातून मिळाली आहे. सदर निवडणुकीत मोदी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. ग्रामीण व शहरी भागातील ओबीसी पट्ट्यात काँग्रेसपेक्षा भाजपने चांगली मते घेतली. तर आदिवासीबहुल भागात काँग्रेसने चांगली मते घेतली आहेत. वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निवडणुकीत १२ हजार ७९४ अशी निर्णायक मते आरमोरी विधानसभा क्षेत्रातून घेतली.

टॅग्स :BJPभाजपा