शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

अजून ३६ हजार कुटुंब शौचालयापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:03 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व, म्हणजे ४५६ ग्रामपंचायती शासन दफ्तरी १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र तरीही तब्बल ३६ हजार १८७ कुटुंबांमध्ये अजूनही शौचालय नाही. यातील बहुतांश कुटुंब हे नव्याने अस्तित्वात आल्याने आणि काही पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटल्याने ते लोक शौचालयापासून वंचित राहिल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देहागणदारीमुक्त जिल्ह्याची स्थिती : संपूर्ण हागणदारीमुक्तीसाठी हवेत ४३ कोटी

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व, म्हणजे ४५६ ग्रामपंचायती शासन दफ्तरी १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र तरीही तब्बल ३६ हजार १८७ कुटुंबांमध्ये अजूनही शौचालय नाही. यातील बहुतांश कुटुंब हे नव्याने अस्तित्वात आल्याने आणि काही पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटल्याने ते लोक शौचालयापासून वंचित राहिल्याचे सांगितले जात आहे. आता या सर्व पात्र कुटुंबांच्या घरी शौचालय उभारण्यासाठी आणखी ४३ कोटी ४२ लाखांचे अनुदान द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे केली आहे.२०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात एकूण १ लाख ८५ हजार १७४ कुटुंबे होती. त्यापैकी ७१ हजार ९१२ कुटुंबांमध्ये शौचालय होते, तर १ लाख १३ हजार २६२ कुटुंबे शौचालयापासून दूर होती. आता सहा वर्षात त्या सर्व कुटुंबांमध्ये शौचालयाची उभारणी करून जिल्हा हागणदारीमुक्त केल्याचा गवगवा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने यावर्षीच्या उन्हाळ्यात केला. मात्र २०१२ च्या पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेली आणि नव्याने तयार झालेली ३७ हजार ३७ कुटुंबे अजूनही शौचालयापासून वंचित असल्याचे आता या विभागाच्या लक्षात आले.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय अनुदानासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार १८७ कुटुंबांकडून आता शौचालयासाठी आॅनलाईन प्रस्ताव भरणे सुरू करण्यात आले आहे. पंचायत समित्यांमार्फत त्यांची माहिती येत्या १५ डिसेंबरपर्यंत भरून पाठवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित२०१२ च्या सर्व्हेक्षणातून सुटलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ३७ हजार ३७ कुटुंबांपैकी केवळ ७८४ कुटुंबांकडे आजघडीला शौचालय आहेत. उर्वरित कुटुंबांपैकी केवळ ६६ कुटुंब वगळता इतर ३६ हजार १८७ कुटुंब शासनाच्या शौचालय अनुदानासाठी पात्र आहेत. त्यांना शौचालय बांधणी आणि वापरासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रतिकुटुंब १२ हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी ४३ कोटी ४२ लाख रुपयांची गरज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला, पण अद्याप शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.७२०८ लाभार्थ्यांना निधीची प्रतीक्षास्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निधीसाठी अनुदान मंजूर ठरूनही अद्याप जिल्ह्यातील ७२०८ कुटुंबे प्रत्यक्ष अनुदानाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना ८ कोटी ६४ लाख ९६ हजार रुपये अनुदान देणे बाकी आहे. यात सर्वाधिक २७९८ लाभार्थी चामोर्शी तालुक्यातील आहेत. याशिवाय अहेरी तालुक्यातील १९९४ लाभार्थी, एटापल्ली तालुक्यातील १५४७, सिरोंचा तालुक्यातील ९२९, कोरची तालुक्यातील ६ तर गडचिरोली तालुक्यातील एका लाभार्थ्याचा समावेश आहे.