शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

अजून ३६ हजार कुटुंब शौचालयापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:03 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व, म्हणजे ४५६ ग्रामपंचायती शासन दफ्तरी १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र तरीही तब्बल ३६ हजार १८७ कुटुंबांमध्ये अजूनही शौचालय नाही. यातील बहुतांश कुटुंब हे नव्याने अस्तित्वात आल्याने आणि काही पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटल्याने ते लोक शौचालयापासून वंचित राहिल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देहागणदारीमुक्त जिल्ह्याची स्थिती : संपूर्ण हागणदारीमुक्तीसाठी हवेत ४३ कोटी

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व, म्हणजे ४५६ ग्रामपंचायती शासन दफ्तरी १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र तरीही तब्बल ३६ हजार १८७ कुटुंबांमध्ये अजूनही शौचालय नाही. यातील बहुतांश कुटुंब हे नव्याने अस्तित्वात आल्याने आणि काही पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटल्याने ते लोक शौचालयापासून वंचित राहिल्याचे सांगितले जात आहे. आता या सर्व पात्र कुटुंबांच्या घरी शौचालय उभारण्यासाठी आणखी ४३ कोटी ४२ लाखांचे अनुदान द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे केली आहे.२०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात एकूण १ लाख ८५ हजार १७४ कुटुंबे होती. त्यापैकी ७१ हजार ९१२ कुटुंबांमध्ये शौचालय होते, तर १ लाख १३ हजार २६२ कुटुंबे शौचालयापासून दूर होती. आता सहा वर्षात त्या सर्व कुटुंबांमध्ये शौचालयाची उभारणी करून जिल्हा हागणदारीमुक्त केल्याचा गवगवा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने यावर्षीच्या उन्हाळ्यात केला. मात्र २०१२ च्या पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेली आणि नव्याने तयार झालेली ३७ हजार ३७ कुटुंबे अजूनही शौचालयापासून वंचित असल्याचे आता या विभागाच्या लक्षात आले.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय अनुदानासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार १८७ कुटुंबांकडून आता शौचालयासाठी आॅनलाईन प्रस्ताव भरणे सुरू करण्यात आले आहे. पंचायत समित्यांमार्फत त्यांची माहिती येत्या १५ डिसेंबरपर्यंत भरून पाठवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित२०१२ च्या सर्व्हेक्षणातून सुटलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ३७ हजार ३७ कुटुंबांपैकी केवळ ७८४ कुटुंबांकडे आजघडीला शौचालय आहेत. उर्वरित कुटुंबांपैकी केवळ ६६ कुटुंब वगळता इतर ३६ हजार १८७ कुटुंब शासनाच्या शौचालय अनुदानासाठी पात्र आहेत. त्यांना शौचालय बांधणी आणि वापरासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रतिकुटुंब १२ हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी ४३ कोटी ४२ लाख रुपयांची गरज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला, पण अद्याप शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.७२०८ लाभार्थ्यांना निधीची प्रतीक्षास्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निधीसाठी अनुदान मंजूर ठरूनही अद्याप जिल्ह्यातील ७२०८ कुटुंबे प्रत्यक्ष अनुदानाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना ८ कोटी ६४ लाख ९६ हजार रुपये अनुदान देणे बाकी आहे. यात सर्वाधिक २७९८ लाभार्थी चामोर्शी तालुक्यातील आहेत. याशिवाय अहेरी तालुक्यातील १९९४ लाभार्थी, एटापल्ली तालुक्यातील १५४७, सिरोंचा तालुक्यातील ९२९, कोरची तालुक्यातील ६ तर गडचिरोली तालुक्यातील एका लाभार्थ्याचा समावेश आहे.