शहरं
Join us  
Trending Stories
1
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
3
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
4
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
5
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
6
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
7
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
8
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
9
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
10
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
11
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
12
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
13
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
14
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
15
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
16
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
17
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
18
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
19
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोखरलेला डोंगर अन् सपाट झालेलं आमचं जंगल डोळ्यानं पाहवत नाहीये... आदिवासींची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 13:28 IST

सुरजागड येथे अतिरिक्त २५ लोह खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वयत्त परिषदेसह शेकडो आदिवासींंनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

ठळक मुद्देसुरजागडविरुद्ध वातावरण तापले : दुसऱ्या दिवशीही ठिय्या कायम

शताली शेडमाके

गडचिरोली : 'शेकडो वर्षांपासूनचा हा निसर्गाचा ठेवा हा आमच्यासाठी देवासमान आहे. आम्ही निसर्गाची पूजा करतो अन् आमचं सर्वकाही या निसर्गावरच अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमचा निसर्ग आमच्यापासून उचलून, मोडून, तोडून जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने चोरुन घेऊन जाण्याचे कारस्थान काहींनी रचले जात आहे. आम्हाला मदत करा...' ही आर्त हाक आहे जिल्ह्यातील अनेक आदिवासींची जे गेल्या दोन दिवसांपासून सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाविरोधात पहाडाखाली जमले आहेत.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. मागिल सहा वर्षांपासून या पहाडावरील हे उत्खनन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुरजागडसह इतर खाणी रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील आदिवासी समुदाय प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे सरकारने हे उत्खनन थांबवण्याऐवजी अतिरिक्त २५ खाणींना मंजुरी दिली असून ही मंजुरी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून खाणी रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासींनी एटापल्लीतील हेडरी नाक्यावर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून यामुळे वातावरण तापले आहे.

पर्यावरणाचा जगभर र्‍हास सुरू असताना त्याचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. त्यात ज्या आदिवासींनी आजवर जंगल जपून ठेवत निसर्गाला जिवंत ठेवण्याचे काम केले आज त्यांच्याकडून त्याचं जंगल हिसकावून घेण्याचा प्रकार सुरू आहे. एकवेळ तोडलेली झाडे लावता येतीलही पण चोरीला गेलेला डोंगर कसे बांधणार? असा उद्विग्न प्रश्न माडिया समुदायातील सामाजिक कार्यकर्ता ॲड. लालसू नोगोटी यांनी विचारला आहे. 

आज आपण फक्त पाहत बसलो, शांत राहिलो तर पुढच्या ३० वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक वनराईअसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलं नष्ट होतील. पहाड उद्वस्त झाल्यानं झरे, नाले, नद्या कोरड्या पडतील. येथील जैवविविधता नष्ट होईल. जंगलाचा राजा असणारा आदिवासी गुलाम बनून जाईल. तेव्हा जंगल वाचवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी आम्हाला आपली साथ द्या. आमची सोबत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, एटापल्ली तालुक्यात आदिवासींचे वास्तव्य असलेल्या पारंपरिक वन क्षेत्रातील सुरजागड भागात सरकारकडून लोहखनिज उत्खनन प्रस्तावित करण्यात आले आहे. याला लोकांचा सुरुवातीपासून तीव्र विरोध होता. तर आता सरकारने अतिरिक्त २५ खाणींना मजुरी दिली. ही मंजुरी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून शेकडो आदिवासी जमले असून खाणींविरोधातील सोमवारच्या विशाल मोर्चानंतर पद्देवाही फाट्याजवळ ग्रामस्थांनी ठिय्या मांडला आहे.

टॅग्स :Socialसामाजिकagitationआंदोलन