शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पोखरलेला डोंगर अन् सपाट झालेलं आमचं जंगल डोळ्यानं पाहवत नाहीये... आदिवासींची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 13:28 IST

सुरजागड येथे अतिरिक्त २५ लोह खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वयत्त परिषदेसह शेकडो आदिवासींंनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

ठळक मुद्देसुरजागडविरुद्ध वातावरण तापले : दुसऱ्या दिवशीही ठिय्या कायम

शताली शेडमाके

गडचिरोली : 'शेकडो वर्षांपासूनचा हा निसर्गाचा ठेवा हा आमच्यासाठी देवासमान आहे. आम्ही निसर्गाची पूजा करतो अन् आमचं सर्वकाही या निसर्गावरच अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमचा निसर्ग आमच्यापासून उचलून, मोडून, तोडून जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने चोरुन घेऊन जाण्याचे कारस्थान काहींनी रचले जात आहे. आम्हाला मदत करा...' ही आर्त हाक आहे जिल्ह्यातील अनेक आदिवासींची जे गेल्या दोन दिवसांपासून सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाविरोधात पहाडाखाली जमले आहेत.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. मागिल सहा वर्षांपासून या पहाडावरील हे उत्खनन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुरजागडसह इतर खाणी रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील आदिवासी समुदाय प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे सरकारने हे उत्खनन थांबवण्याऐवजी अतिरिक्त २५ खाणींना मंजुरी दिली असून ही मंजुरी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून खाणी रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासींनी एटापल्लीतील हेडरी नाक्यावर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून यामुळे वातावरण तापले आहे.

पर्यावरणाचा जगभर र्‍हास सुरू असताना त्याचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. त्यात ज्या आदिवासींनी आजवर जंगल जपून ठेवत निसर्गाला जिवंत ठेवण्याचे काम केले आज त्यांच्याकडून त्याचं जंगल हिसकावून घेण्याचा प्रकार सुरू आहे. एकवेळ तोडलेली झाडे लावता येतीलही पण चोरीला गेलेला डोंगर कसे बांधणार? असा उद्विग्न प्रश्न माडिया समुदायातील सामाजिक कार्यकर्ता ॲड. लालसू नोगोटी यांनी विचारला आहे. 

आज आपण फक्त पाहत बसलो, शांत राहिलो तर पुढच्या ३० वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक वनराईअसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलं नष्ट होतील. पहाड उद्वस्त झाल्यानं झरे, नाले, नद्या कोरड्या पडतील. येथील जैवविविधता नष्ट होईल. जंगलाचा राजा असणारा आदिवासी गुलाम बनून जाईल. तेव्हा जंगल वाचवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी आम्हाला आपली साथ द्या. आमची सोबत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, एटापल्ली तालुक्यात आदिवासींचे वास्तव्य असलेल्या पारंपरिक वन क्षेत्रातील सुरजागड भागात सरकारकडून लोहखनिज उत्खनन प्रस्तावित करण्यात आले आहे. याला लोकांचा सुरुवातीपासून तीव्र विरोध होता. तर आता सरकारने अतिरिक्त २५ खाणींना मजुरी दिली. ही मंजुरी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून शेकडो आदिवासी जमले असून खाणींविरोधातील सोमवारच्या विशाल मोर्चानंतर पद्देवाही फाट्याजवळ ग्रामस्थांनी ठिय्या मांडला आहे.

टॅग्स :Socialसामाजिकagitationआंदोलन