वर्ग जोडण्यासाठी तीन किमीची अट शिथिल करा
By Admin | Updated: May 10, 2014 00:12 IST2014-05-10T00:12:49+5:302014-05-10T00:12:49+5:30
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार इयत्ता चौथीला पाचवा वर्ग व सातवीला आठवा वर्ग जोडण्यात येणार आहे.

वर्ग जोडण्यासाठी तीन किमीची अट शिथिल करा
गडचिरोली : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार इयत्ता चौथीला पाचवा वर्ग व सातवीला आठवा वर्ग जोडण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी १ किमी व ८ किमी अंतराची अट टाकण्यात आली आहे. सदर अट रद्द करावी, अशी मागणी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. महाराष्टÑामध्ये १ ते ४ वर्गापर्यंत प्राथमिक शिक्षण, ५ ते ७ पर्यंत उच्च प्राथमिक शिक्षण, ८ ते १० पर्यंत माध्यमिक व ११ ते १२ पर्यंत उच्च माध्यमिक शिक्षण अशी वर्गवारी करण्यात आली आहे. महाराष्टÑातील वर्गवारीच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या १ ते ४ वर्गाला पाचवा वर्ग व १ ते ७ च्या वर्गाला आठवा वर्ग जोडण्यात येणार आहे. मात्र पाचवा वर्ग जोडण्यासाठी १ किमी अंतर व आठवा वर्ग जोडण्यासाठी ३ किमी अंतराची अट घालण्यात आली आहे. या अंतरामध्ये शाळा असल्यास पाचवा वर्ग व आठवा वर्ग जोडण्यास मनाई करण्यात आली आहे. ३ किमीपेक्षा कमी अंतरावर काही खासगी माध्यमिक शाळा आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे अनेक शाळांना वर्ग जोडण्यास मोठी अडचण जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळी आहे. शाळेमधील अंतर जरी कमी असले तरी दोन गावाच्या मध्ये घनदाट जंगल, नदी-नाले आहेत. यामधून प्रवास करणे धोक्याचे आहे. विशेष करून पावसाळ्यामध्ये रस्ते व पुलांअभावी अनेक गावांचा संपर्क तुटतो. जिल्ह्याच्या बर्याच भागात वाहतुकीची सोय नाही. त्यामुळे पायदळ जावे लागते. अशा भौगोलिक परिस्थिती पाचव्या वर्गातला विद्यार्थी एक किमी व आठव्या वर्गातला विद्यार्थी ३ किमी जाऊ शकत नाही. जिल्ह्याच्या परिस्थितीचा विचार करून स्थानिक व्यवस्थापन समितीची मागणी असल्यास १ किमी व ३ किमीची अंतर शिथील करून जिल्हा परिषदेच्या शाळांना चौथ्या वर्गास पाचवा वर्ग व सातवा वर्गास आठवा वर्ग जोडण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, नरेंद्र कत्रोजवार, रमेश रामटेके, रविंद्र मुलकलवार आदींनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)