शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१० रेतीघाटांमधून सात कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

राज्याच्या पर्यावरण समितीच्या मान्यतेअभावी जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव थांबला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आल्याने जाहीर झालेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २५ रेतीघाटांसाठी लिलाव करण्यात आला. परंतू त्यात १० घाटांसाठीच नियमानुसार निविदा आल्या. शासनाने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा बरीच जास्त किंमत या घाटांना मिळाली आहे.

ठळक मुद्देबांधकामे मार्गी लागणार, १५ घाटांच्या लिलावसाठी पुन्हा हाेणार निविदा प्रक्रिया

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित रेतीघाटांच्या लिलावची प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. पहिल्या लिलावात २५ पैकी १० घाटांचा लिलाव होऊ शकला. यात मोठ्या घाटांचा समावेश नसला तरी ज्या घाटांचा लिलाव झाला त्यातून रखडलेली बांधकामे पुन्हा सुरू होतील. राज्याच्या पर्यावरण समितीच्या मान्यतेअभावी जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव थांबला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आल्याने जाहीर झालेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २५ रेतीघाटांसाठी लिलाव करण्यात आला. परंतू त्यात १० घाटांसाठीच नियमानुसार निविदा आल्या. शासनाने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा बरीच जास्त किंमत या घाटांना मिळाली आहे. त्यातून ७ कोटीपेक्षा जास्त महसूल शासनाला मिळत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच तीन वर्षासाठी, म्हणजे २०२२-२३ पर्यंत संबंधितांचा त्यावर अधिकार राहणार आहे. मात्र त्यांना दरवर्षी त्याचा मोबदला शासनाकडे भरावा लागेल.निविदा न आलेल्या १५ रेतीघाटांमध्ये अनेक मोठ्या घाटांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर असलेल्या मुकडीगटा रै., मद्दीकुंटा, रेगुंठामाल, अंकिसामाल, चिंतरवेला आणि आरडा आदी घाटांचा समावेश आहे. या घाटांची किंमत प्रत्येकी २.४७ कोटी ते ३.७१ कोटी आहे. यावर्षी तेलंगणा राज्यातील अनेक रेतीघाट आधीच सुरू करण्यात आल्यामुळे आणि या घाटांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. यासोबतच कुरखेडा तालुक्यातील सती नदी, चामोर्शी तालुक्यातील  पोहार आणि कठाणी नदीवरील काही घाटांचा लिलाव होऊ शकला नाही. त्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया केली जात आहे.   

लिलाव झालेले घाट आणि त्यांची किंमतबोदलीमाल (८४ लाख), लांझेडा (७६ लाख), अडपल्ली-१ (४५.७५ लाख), अडपल्ली-२ (५९.५१ लाख), आंबेशिवणी-राममंदिरघाट (४६ लाख), दिभनाचक (६० लाख), रामपूरचक (७७ लाख), वनखी (१.६० कोटी), नान्हीघाट (५६ लाख), मेडाराममाल (३५ लाख)

सामान्य नागरिकांनाही मिळणार दिलासावर्षभरापासून रेतीचे लिलाव रखडले असल्याने दामदुप्पट दराने रेती खरेदी करावी लागत हाेती. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी घराचे बांधकाम किंवा इतर बांधकामासाठी रेतीचे हे दर अवाक्याबाहेर गेले हाेते. परंतु आता लिलाव प्रक्रिया झाल्याने अनेक घाटांमधून अधिकृतपणे रेती मिळणार आहे. त्यामुळे रेतीचे दर कमी हाेऊन रखडलेली बांधकामे मार्गी लागतील, या कल्पनेने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :sandवाळू