वृक्ष लागवडीचे ५७ टक्के उद्दिष्ट साध्य

By Admin | Updated: December 9, 2014 22:51 IST2014-12-09T22:51:06+5:302014-12-09T22:51:06+5:30

महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ९२ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होते. मात्र ३ डिसेंबरपर्यंत केवळ

57 percent of tree plantation achieve goal | वृक्ष लागवडीचे ५७ टक्के उद्दिष्ट साध्य

वृक्ष लागवडीचे ५७ टक्के उद्दिष्ट साध्य

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ९२ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होते. मात्र ३ डिसेंबरपर्यंत केवळ ५२ लाख ५९ हजार ७१९ वृक्षांची लागवड करण्यात आली असून उद्दिष्टाच्या ५७ टक्के वृक्ष लागवड झाली आहे.
वाढलेली लोकसंख्या, औद्योगिकरण, शेती यासाठी जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली. त्यामुळे जंगलाच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेने मात्र पर्यावरण योग्य राहण्यासाठी किमान ३३ टक्के जंगल असणे, आवश्यक करण्यात आले आहे. वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने २ वर्षापूर्वी राज्यात शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ५ वर्षात १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यासाठी वनविभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनिकरण विभाग, कृषी विभाग, एफडीसीएम आदी विभागांना वृक्षांची लागवड करणे व ती जगविण्याची जबाबदारी देण्यात आली. मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विभागांना ८८ लाख ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ९२ लाख ७२ हजार ८०५ वृक्षांची लागवड करण्यात आली. मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड झाली. यावर्षी मात्र वृक्ष लागवडीचा उत्साह मावळला असल्याचे दिसून येते.
वृक्षांची लागवड मुख्यत: पावसाळ्याच्या सुरूवातीला व पावसाळ्यात करण्यात येते. पावसाळा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे यानंतर आता वृक्ष लागवड करणे, जवळपास अशक्य आहे. असे असतांनाही केवळ ५२ लाख ५९ हजार ७१९ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. म्हणजेच दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ५७.४ टक्केच वृक्षांची लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वृक्ष लागवड कमी झाली आहे. यावरून नागरिकांचा शतकोटी वृक्ष लागवडीतील उत्साह मावळत चालला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कृषी विभागाने तर संपूर्ण जिल्ह्यात केवळ ३२० वृक्षांची लागवड केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 57 percent of tree plantation achieve goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.