शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पाच वर्षात ५६ जणांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:21 AM

पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : वीज पडून सर्वाधिक ३७ जणांचा मृत्यू, ५४ नागरिक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.नदी, नाल्यांना येणारा पूर, अतिवृष्टी, झाडे व घर कोसळणे यासह वीज पडणे यासारख्या नैसर्गिक संकटांना दरवर्षीच नागरिकांना तोंड द्यावे लागते. सुविधांच्या अभावामुळे पुराच्या वेढ्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे एक आव्हानच असते. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. वैनगंगा, खोब्रागडी, कठानी, इंद्रावती, र्पकोटा, सती या नद्यांसह अनेक उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. पावसाळ्यात या नद्यांना येणारे पूर नदीकाठावरच्या नागरिकांसाठीच नाही तर नदी ओलांडून जावे लागणाऱ्या अनेक गावांसाठीही मोठे अडचणीचे ठरतात. आपत्ती निवारण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात पुरात वाहून गेल्याने १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात वर्ष २०१३ मध्ये ७, २०१४ मध्ये ३ आणि २०१६ मध्ये ५ लोकांचा बळी गेला आहे. मात्र २०१५ आणि २०१७ मध्ये पुरात कोणालाही प्राण गमवावे लागले नाही. अतिवृष्टीमुळे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घर आणि झाड पडल्याने २०१३ मध्ये २ आणि २०१४ मध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले. यानंतर घरे आणि झाडे पडण्याच्या अनेक घटना झाल्या, पण यात जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक वीज पडून मरण पावणाºयांची संख्या ३७ आहे. तर ५४ जण जखमी झाले आहेत. यासोबतच काही प्राण्यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस