परीक्षा न देताच सीबीएसईचे ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST2021-04-19T04:34:12+5:302021-04-19T04:34:12+5:30
बाॅक्स सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी २३५ मुले २३० मुली अकरावी, आयटीआयचे प्रवेश कसे हाेणार? काेराेना महामारीच्या समस्येमुळे ...

परीक्षा न देताच सीबीएसईचे ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण
बाॅक्स
सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी
२३५ मुले २३० मुली
अकरावी, आयटीआयचे प्रवेश कसे हाेणार?
काेराेना महामारीच्या समस्येमुळे यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षा झाल्या नाही. सीबीएसई बाेर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दहावीनंतरच्या इयत्ता अकरावी, आयटीआय व पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाला काेणत्या आधारवर व कशा प्रकारे विद्यार्थ्यांचे प्रवेश हाेणार आहेत, याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्णय झाला नाही.
गुणदानाबाबत अनिश्चितता
सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. मात्र निकाल नेमका कशा प्रकारे लागणार आहे, हे अजूनही अनिश्चित आहे. ग्रेड पद्धतीने गुणदान हाेते की, मार्क देतात, याबाबत निर्णय झाला नाही. इयत्ता दहावीला पाच विषय असतात. ५०० गुणांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये प्रत्येक विषयाचे २० गुण हे शाळेकडून मिळत असतात.
काेट
काेराेना महामारीच्या समस्येमुळे यावर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. आता सीबीएसई बाेर्डाची परीक्षा रद्द झाली आहे. विद्यार्थ्यांना याेग्यरित्या गुणदान करण्यात यावे. जेणेकरून पुढील प्रवेशाला अडचण येणार नाही.
- रवींद्र करपे, पालक गडचिराेली
काेराेनामुळे ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे परिपूर्णपणे आकलन झाले नाही. आता परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी काेणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नाही, असा निकाल अपेक्षित आहे.
- सुधाकर रामटेके, पालक गडचिराेली
मध्यंतरीच्या काळात काेराेनाची पहिली लाट थांबल्याने दीड ते दाेन महिने ऑफलाईन क्लासेस झाले. मात्र त्यापूर्वी माेबाईलच्या साहाय्याने ऑनलाईन शिक्षण सुरू हाेते. आता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने आमच्या पाल्यांना पुढील वर्षात कसे प्रवेश मिळणार, असा प्रश्न आहे.
- प्रदीप शेंडे, पालक