शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

४३ पुलांमुळे तुटणार संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:19 AM

अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही.

ठळक मुद्देपर्यायी मार्गच नाही : २५४ गावातील ७४ हजार नागरिकांना बसणार पावसाचा फटका

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही. याशिवाय काही ठिकाणी नद्या आणि नाल्यांवरच पूलच नाही. परिणामी पावसाळ्यात २५४ गावांमधील ७४ हजार ४९२ नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे.दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांची, पुलांची कामे करताना प्रशासनाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. नक्षली त्रासामुळे ही कामे घेण्यासाठी कंत्राटदारही पुढे येत नाहीत. त्यामुळे अनेक रस्ते, पूल मंजूर होऊनही त्यांचे बांधकाम होऊ शकलेले नाही. याचा फटका त्या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून बसत आहे. यावर्षीही २५४ गावांमधील ७४ हजार ४९२ नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार असल्यामुळे त्या गावांत चार महिन्यांचा रेशन पुरवठा, औषधीसाठा पोहोचविण्यात आला आहे.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या ६ तालुक्यांमधील गावांमध्ये सर्वाधिक ७६ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल ६० गावे अहेरी तर ५३ गावे भामरागड तालुक्यातील आहेत. या गावांमध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप केल्या जाणारे तीन ते चार महिन्यांचे साहित्य पोहोचविण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर.चांदुरकर यांनी सांगितले. त्यात गहू, तांदूळ आणि साखरेचाही समावेश आहे. या संपर्क तुटणाºया गावांमध्ये १२९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे काही गावातील नागरिकांना दुसºया गावातील स्वस्त धान्य दुकानांशी जोडण्यात आले आहे.नागरी जीवनमानावर परिणाम करणाºया जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये गाढवी नदी, कठाणी नदी, कोटरी नदी, पोहार नदी, दिना नदी, इंद्रावती नदी, वटीगंगा नदी, खोब्रागडी नदी, प्राणहिता नदी, तेलनालू नदी, बांडीया नदी या नद्यांसोबत अनेक नाल्यांचा समावेश आहे.संपर्क तुटणाºया गावांमध्ये पावसाच्या दिवसात उद्भवणाºया संभावित आजारांचा अंदाज घेऊन त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये औषधीचा साठाही पोहोचविण्यात आला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर