शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

३६ उद्योग पडले बंद, पण भूखंडावर ताबा कायम ; सांगा, कसा होणार औद्योगिक विकास ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:03 IST

Gadchiroli : उद्योगातील कार्यरत कामगारांचा रोजगार हिरावला

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहराच्या जवळ कोटगल भागात असलेल्या येथील एमआयडीसीमधील अनेक भूखंड अजूनही रिकामे पडून आहेत. तसेच, उद्योजकांच्या अनेक अडचणींमुळे या एमआयडीसीतील तब्बल ३६ उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे या उद्योगातील कार्यरत कामगारांचा रोजगार हिरावला आहे. मात्र, संबंधित भूखंड अजूनही संबंधित उद्योजकांच्या ताब्यात आहेत. भूखंडावरील ताबा व्यावसायिकांनी सोडला नाही.

येथे निर्माण होणाऱ्या नव्या उद्योगांची संख्या फार कमी आहे. याउलट बंद होणाऱ्या उद्योगांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीमुळे गडचिरोलीचा औद्योगिक विकास कसा होणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. उद्योग बंद पडलेले भूखंड परत घेण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

केंद्र व राज्य सरकार रोजगार निर्मितीसाठी व औद्योगिक विकासासाठी धोरण आखत असते. या धोरणाची अंमलबजावणी करण्याची करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दरम्यान राज्य सरकारच्या वतीने औद्योगिक विकास करण्याच्या हेतूने प्रत्येक जिल्ह्यात एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली. दरम्यान शासकीय, तसेच खासगी जागेचे अधिग्रहण करून ही जागा उद्योजकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयी कोटगल मार्गालगत सन १९९० मध्ये एमआयडीसीची निर्मिती करून भूखंड विकसीत करण्यात आले, तेव्हापासून आतापर्यंत भूखंड उद्योजकांना वितरीत करून येथे उद्योग निर्मितीला चालना देण्यात आली. मात्र, या एमआयडीसीमध्ये गेल्या काही वर्षांत बोटावर मोजण्याइतके उद्योग सोडले, तर फारसे नवे उद्योगाची निर्मिती झाली नाही. 

गडचिरोलीतील एमआयडीसीची स्थिती एकूण भूखंड - १७१ बांधकामे सुरू - ३० उद्योग सुरू आहेत - ४४ शिल्लक भूखंड - ०६ 

कधी दूर होणार उद्योजकांची उदासीनता? जिल्हास्तरावरही औद्योगिक विकासाला गती नसल्याचे दिसून येते. मोठ्या शहरांमध्ये अनेक उद्योजकांना एमआयडीसीमध्ये जागा मिळत नसल्याने व्यावसायिक दराची जागा खरेदी करून उद्योग उभारावा लागतो. तर, गडचिरोलीत मुबलक जागा उपलब्ध असतानाही उउद्योजक पुढे येत नसल्याचे दिसून येते. उद्योजकांची उदासीनता कधी दूर होणार, असा प्रश्न आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीGadchiroliगडचिरोली