शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

३१ कोटींचे रेतीघाट बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:54 IST

जिल्ह्याच्या सरकारी महसुलात मोठे योगदान देणाऱ्या रेतीघाटांच्या लिलावात यावर्षी खनिकर्म विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाला नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लिलावांमध्ये अवघा २० कोटी २४ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.

ठळक मुद्दे१९ घाट अधांतरी : ५६ घाटांमधून अवघा २०.२४ कोटींचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या सरकारी महसुलात मोठे योगदान देणाऱ्या रेतीघाटांच्या लिलावात यावर्षी खनिकर्म विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाला नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लिलावांमध्ये अवघा २० कोटी २४ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. मात्र ३१ कोटी ६३ लाख रुपयांचे रेतीघाट अद्यापही लिलावापासून दूर आहेत. परिणामी यातील अनेक घाटांवर रेती माफियांची वक्रदृष्टी पडली असून त्यातून अनधिकृतपणे रेतीचा उपसाही केला जात आहे.यावर्षी भूजल सर्व्हेक्षण यंत्रणा, पर्यावरण समितीच्या परवानगीनंतर जिल्ह्यातील १०१ रेतीघाट लिलावासाठी ठेवले होते. त्यापैकी पहिल्या लिलावात ७३ घाटांवर कंत्राटदारांनी बोली लावली. त्यांची शासकीय किंमत ११ कोटी ९५ हजार ७७ हजार ४०० रुपये होती. मात्र प्रत्यक्षात ते घाट १५ कोटी ९१ लाख १२ हजार ७११ रुपयांना गेले. १३ नोव्हेंबरला काढलेल्या दुसऱ्या लिलावात ८ घाट गेले. त्यांची शासकीय किंमत २ कोटी ८५ लाख २४ हजार २८६ रुपये होती. प्रत्यक्षात या घाटांसाठी ३ कोटी २५ लाख ७३ हजार १७४ रुपये महसूल मिळाला. तिसऱ्या लिलावात ३ रेतीघाटांवर कंत्राटदारांनी बोली लावली. त्यात १ कोटी ७९ लाख २९ हजार ९९८ रुपयांचा महसूल मिळाला. मात्र १७ घाटांवर कोणत्याही कंत्राटदारांनी बोली लावली नाही.गोदावरी, वैनगंगासारख्या मोठ्या नद्यांसोबत इतर नद्यांच्या रेतीघाटांमुळे जिल्ह्याला दरवर्षी मोठा महसूल मिळतो. गोदावरीच्या रेतीघाटांचा कंत्राट घेण्यात तेलंगणातील कंत्राटदारांचा पुढाकार असतो. मात्र यावर्षी रेतीघाटांकडे तेलंगणातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. रेतीची मागणी तेलंगणात जास्त प्रमाणात असताना त्यांनी रेतीच्या कंत्राटासाठी बोली का लावली नाही, हे सुद्धा एक कोडेच आहे.कंत्राटदार-अधिकाऱ्यांची मिलीभगत?यावर्षी रेतीघाटांचे तीनही लिलाव मिळून बोली लागलेल्या सर्व घाटांच्या किमतीपेक्षा शिल्लक राहिलेल्या घाटांची किंमत जास्त आहे. मूळ किमतीनुसार या शिल्लक घाटांची किंमत ३१ कोटींपेक्षा जास्त आहे. चौथ्या लिलावात ही किंमत २५ टक्क्यांनी घटविली. मात्र त्याच वेळी उच्च न्यायालयाने सँड मायनिंग प्लॅनची अट घालणारा आदेश दिल्याने तो लिलाव रद्द करावा लागला. मोठ्या रेतीघाटांवर बोली न लावण्यामागे मोठ्या रेती कंत्राटदारांची एकजूट असल्याचे बोलले जाते. कोणीच बोली लावण्यासाठी पुढे यायचे नाही आणि नंतर आपसी समझोत्यातून त्या घाटांमधील रेतीचा अनधिकृत उपसा करायचा, अशी त्यांची योजना आहे. त्यात काही अधिकाऱ्यांनाही त्यांनी हाताशी धरल्याचे सांगितले जाते.मायनिंग प्लॅनची अडचण केव्हा दूर करणार?नदीतील रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करण्यासाठी रेती उपसा योजना (सँड मायनिंग प्लॅन) असावी, त्याशिवाय कोणत्याही रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करू नये, अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात एका व्यक्तीने दाखल केली आहे. ती याचिका दाखल करून घेत न्यायालयाने सर्वच जिल्ह्यातील रेतीघाटांच्या उपशावर स्थगनादेश दिला आहे. आता सँड मायनिंग प्लॅन केव्हा तयार करणार आणि मोठ्या किमतीच्या रेतीघाटांचा केव्हा लिलाव करणार, तोपर्यंत त्या घाटांमधील रेतीचा चोरट्या मार्गाने उपसा झाल्यास किती रेती शिल्लक राहणार, हे प्रश्न अडचणीचे ठरणार आहे. एकूण परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाला या व्यवहारात बºयाच महसुलावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.