शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

३१ कोटींचे रेतीघाट बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:54 IST

जिल्ह्याच्या सरकारी महसुलात मोठे योगदान देणाऱ्या रेतीघाटांच्या लिलावात यावर्षी खनिकर्म विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाला नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लिलावांमध्ये अवघा २० कोटी २४ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.

ठळक मुद्दे१९ घाट अधांतरी : ५६ घाटांमधून अवघा २०.२४ कोटींचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या सरकारी महसुलात मोठे योगदान देणाऱ्या रेतीघाटांच्या लिलावात यावर्षी खनिकर्म विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाला नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लिलावांमध्ये अवघा २० कोटी २४ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. मात्र ३१ कोटी ६३ लाख रुपयांचे रेतीघाट अद्यापही लिलावापासून दूर आहेत. परिणामी यातील अनेक घाटांवर रेती माफियांची वक्रदृष्टी पडली असून त्यातून अनधिकृतपणे रेतीचा उपसाही केला जात आहे.यावर्षी भूजल सर्व्हेक्षण यंत्रणा, पर्यावरण समितीच्या परवानगीनंतर जिल्ह्यातील १०१ रेतीघाट लिलावासाठी ठेवले होते. त्यापैकी पहिल्या लिलावात ७३ घाटांवर कंत्राटदारांनी बोली लावली. त्यांची शासकीय किंमत ११ कोटी ९५ हजार ७७ हजार ४०० रुपये होती. मात्र प्रत्यक्षात ते घाट १५ कोटी ९१ लाख १२ हजार ७११ रुपयांना गेले. १३ नोव्हेंबरला काढलेल्या दुसऱ्या लिलावात ८ घाट गेले. त्यांची शासकीय किंमत २ कोटी ८५ लाख २४ हजार २८६ रुपये होती. प्रत्यक्षात या घाटांसाठी ३ कोटी २५ लाख ७३ हजार १७४ रुपये महसूल मिळाला. तिसऱ्या लिलावात ३ रेतीघाटांवर कंत्राटदारांनी बोली लावली. त्यात १ कोटी ७९ लाख २९ हजार ९९८ रुपयांचा महसूल मिळाला. मात्र १७ घाटांवर कोणत्याही कंत्राटदारांनी बोली लावली नाही.गोदावरी, वैनगंगासारख्या मोठ्या नद्यांसोबत इतर नद्यांच्या रेतीघाटांमुळे जिल्ह्याला दरवर्षी मोठा महसूल मिळतो. गोदावरीच्या रेतीघाटांचा कंत्राट घेण्यात तेलंगणातील कंत्राटदारांचा पुढाकार असतो. मात्र यावर्षी रेतीघाटांकडे तेलंगणातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. रेतीची मागणी तेलंगणात जास्त प्रमाणात असताना त्यांनी रेतीच्या कंत्राटासाठी बोली का लावली नाही, हे सुद्धा एक कोडेच आहे.कंत्राटदार-अधिकाऱ्यांची मिलीभगत?यावर्षी रेतीघाटांचे तीनही लिलाव मिळून बोली लागलेल्या सर्व घाटांच्या किमतीपेक्षा शिल्लक राहिलेल्या घाटांची किंमत जास्त आहे. मूळ किमतीनुसार या शिल्लक घाटांची किंमत ३१ कोटींपेक्षा जास्त आहे. चौथ्या लिलावात ही किंमत २५ टक्क्यांनी घटविली. मात्र त्याच वेळी उच्च न्यायालयाने सँड मायनिंग प्लॅनची अट घालणारा आदेश दिल्याने तो लिलाव रद्द करावा लागला. मोठ्या रेतीघाटांवर बोली न लावण्यामागे मोठ्या रेती कंत्राटदारांची एकजूट असल्याचे बोलले जाते. कोणीच बोली लावण्यासाठी पुढे यायचे नाही आणि नंतर आपसी समझोत्यातून त्या घाटांमधील रेतीचा अनधिकृत उपसा करायचा, अशी त्यांची योजना आहे. त्यात काही अधिकाऱ्यांनाही त्यांनी हाताशी धरल्याचे सांगितले जाते.मायनिंग प्लॅनची अडचण केव्हा दूर करणार?नदीतील रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करण्यासाठी रेती उपसा योजना (सँड मायनिंग प्लॅन) असावी, त्याशिवाय कोणत्याही रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करू नये, अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात एका व्यक्तीने दाखल केली आहे. ती याचिका दाखल करून घेत न्यायालयाने सर्वच जिल्ह्यातील रेतीघाटांच्या उपशावर स्थगनादेश दिला आहे. आता सँड मायनिंग प्लॅन केव्हा तयार करणार आणि मोठ्या किमतीच्या रेतीघाटांचा केव्हा लिलाव करणार, तोपर्यंत त्या घाटांमधील रेतीचा चोरट्या मार्गाने उपसा झाल्यास किती रेती शिल्लक राहणार, हे प्रश्न अडचणीचे ठरणार आहे. एकूण परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाला या व्यवहारात बºयाच महसुलावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.