२८ हजार क्विंटल बियाण्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:57+5:30
२०२० च्या खरीप हंगामात जवळपास २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध ठिकाणची लागवड होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. २०२० च्या खरीप हंगामात २ लाख ३०० हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची लागवड होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. धानासाठी प्रती एकरी ४० किलो बियाणांची गरज भासते. दरवर्षी शेतकरी एका विशिष्ट प्रमाणात बियाणे बदलवितात.

२८ हजार क्विंटल बियाण्यांची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे, कीटकनाशके यांचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी २७ हजार ७३१ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. तेवढी मागणी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे.
२०२० च्या खरीप हंगामात जवळपास २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध ठिकाणची लागवड होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. २०२० च्या खरीप हंगामात २ लाख ३०० हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची लागवड होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. धानासाठी प्रती एकरी ४० किलो बियाणांची गरज भासते. दरवर्षी शेतकरी एका विशिष्ट प्रमाणात बियाणे बदलवितात. एकदा बियाणे खरेदी केल्यानंतर सदर बियाणे जवळपास तीन वर्ष शेतकरी वापरतात. त्यानंतर पुन्हा बियाणे बदलविले जातात. सदर बियाणे खरेदी केले जातात.
२०२० च्या खरीप हंगामात धानाच्या एकूण २६ हजार ७४० क्विंटल बियाणांची गरज भासेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार सार्वजनिक कंपन्यांकडे १५ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. तर खासगी कंपन्यांकडे ११ हजार ७४० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
धानाबरोबरच सोयाबीन, तूर, कापूस, मका, उळीद, तीळ आदी पिकांची लागवड केली जाते. खासगी व सार्वजनिक कंपन्यांकडून खरेदी करण्यात आलेले बियाणे महाग राहते. त्यामुळे बरेचसे शेतकरी कंपन्यांकडून बियाणे खरेदी करण्याऐवजी स्वत:कडचे बियाणे वापरतात. बियाणांची लागवड करण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे या बियाणांचीही उगवण क्षमता अधिक राहते. त्यामुळे बहुतांश शेतकरी घरचेच बियाणे वापरतात.
तुटवडा जावणार नाही
लॉकडाऊनच्या कालावधीतही केंद्र शासनाने शेती व शेतीवर आधारित उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही बियाणांवर प्रक्रिया करून ते पॉकेटबंद करण्याचे काम सुरूच होते. त्यामुळे बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नाही. काही कंपन्यांनी तर कृषी केंद्रांमध्ये बियाणांचा पुरवठा सुरू केला आहे. खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी आवश्यक तेवढे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. शेतकºयांनी अधिकची किंमत मोजू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.