शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तळोधी व रेगुंठा उपसा सिंचनसाठी २७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी यापूर्वी चिचडोह प्रकल्प मार्गी लागला असून कोटगल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.

ठळक मुद्देपुरवणी मागणीत मंजूर : नक्षलग्रस्त भागातील पोलीस विभागाच्या योजनांसाठीही तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी येथील तळोधी (मोकासा) व सिरोंचा येथील रेगुंठा उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याकरीता पुरवणी मागणीद्वारे २७ कोटी रु पयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. याशिवाय नक्षलग्रस्त भागातील पोलीस विभागाच्या योजनांसाठी ५८ कोटींची तरतूद केली. त्यातील बहुतांश वाटा गडचिरोली जिल्ह्यालाच मिळणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश आले.जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी यापूर्वी चिचडोह प्रकल्प मार्गी लागला असून कोटगल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर तळोधी मोकासा येथील उपसा सिंचन प्रकल्पाचे काम, तसेच सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपसा सिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना विनंती केली होती. ना.विजय वडेट्टीवार यांनी तळोधी उपसा सिंचनसाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे सूचित केले होते. त्याचे फलित म्हणून या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण २७ कोटी रु पयांची तरतूद सन २०२०-२१ च्या पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली. त्यामुळे तळोधी मोकासा प्रकल्पातील १६ गावांमध्ये ६०६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.तसेच रेगुंठा प्रकल्पामुळे १७ गावातील ३२८३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या कामासाठी पुढे लागणारा आवश्यक निधी टप्याटप्याने उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनानक्षलप्रवण आदिवासी भागातील चामोर्शी तालुक्यातील दर्शनीमाल गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर या योजनेचे काम सुरू आहे. या योजनेची प्रस्तावित सुधारित प्रशासकिय मान्यता १५५.४५ कोटी रुपयांची आहे. चिचडोह प्रकल्प पूर्ण झाला असून त्यामुळे या योजनेचे काम पूर्ण झाल्यास यातून शाश्वत सिंचन सुरू ठेवता येणार आहे. आतापर्यंत १९ टक्के खर्च या योजनेवर झाला आहे. यात ८.३२ कोटी रुपये झालेल्या कामापैकी दिले आहेत तर २.३० कोटी देयके देणे बाकी आहेत. सदर प्रकल्पास सध्या मंजूर निधीमुळे गती मिळणार आहे. अंदाजे जून २०२२ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.रेगुंठा उपसा सिंचन योजनासिरोंचा तालुक्यातील रेगुंठा गावाजवळ प्राणहिता नदीच्या डाव्या तिरावर या योजनेचे काम सुरू होणार आहे. सुधारीत प्रशासकिय मान्यतेसाठी या योजनेचा खर्च १०२.३६ कोटी प्रस्तावित आहे. त्यापैकी १.३७ कोटी खर्च झाला आहे. या योजनेची पूर्ण उभारणी सन २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. यासाठी शासनाकडून टप्याटप्याने निधी वितरण होणार आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पnaxaliteनक्षलवादी