शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५,३४१ टीसीएम जलसाठा

By admin | Updated: December 26, 2016 01:25 IST

भाजपप्रणित राज्य शासनाने २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली.

सिंचन क्षमता वाढली : जलयुक्त शिवार योजनेची फलश्रृती गडचिरोली : भाजपप्रणित राज्य शासनाने २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ६६.६० कोटी रूपये खर्च करून जलसंधारणाची तब्बल ३ हजार ५६१ कामे पूर्ण करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामातून जिल्ह्यात एकूण २५ हजार ३४१ टीसीएम जलसाठ्याची निर्मिती झाली असून २१ हजार ८१२ हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १५२ गावांची निवड कृती आराखड्यात करण्यात आली. ८०.२७ कोटी रूपये जलसंधारणाच्या कामासाठी आराखड्यानुसार मंजूर करण्यात आले. ३ हजार ९३६ कामे हाती घेण्यात आली. यापैकी ३ हजार ५६१ कामे पूर्ण झाले आहेत. तर ३०० वर कामे प्रगतीपथावर आहेत. ६६.६० कोटी रूपये सन २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामावर खर्च झाले. या कामातून १० हजार ९६० टीसीएम एवढी संरक्षित सिंचनाची अपेक्षीत उपलब्धता होती. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची फलश्रुती पाहून सन २०१६-१७ या चालू वर्षात जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात एकूण १६९ गावांचा समावेश करण्यात आला असून या गावात जलसंधारणाची अनेक कामे मंजूर करण्यात आली आहेत. पाणी ताळेबंद भरलेली व आराखडा भरलेल्या गावांची संख्या १६९ आहे. आॅनलाईन अर्ज करून कामाची मागणी करणाऱ्या गावांची संख्या ५१९ इतकी आहे. निवड करण्यात आलेल्या १६९ गावांमध्ये ६ हजार ६६९ इतकी जलसंधारणाची कामे मंजूर करण्यात आली. सन २०१६-१७ या वर्षात आराखड्यानुसार जलसंधारणाच्या कामांसाठी ११८.९५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी चालू वर्षात संपूर्ण जिल्ह्यात ३२० कामे सुरू करण्यात आली असून आतापर्यंत २०० वर कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. चालू वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १३४ कामे प्रगतीपथावर असून आतापर्यंत या कामांवर ३.४३ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी व राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भाजपप्रणित राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली व सदर योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिले. या अभियानाच्या कामांचा आढावा राज्य सरकार नियमित घेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) मागेल त्याला शेततळे योजनेवर ८६ लाखांचा खर्च गडचिरोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी विभागामार्फत मागेल त्याला शेततळे ही योजना सन २०१५-१६ वर्षापासून सुरू केली. सन २०१५-१६ व २०१६-१७ या पावणेदोन वर्षात आतापर्यंत शेततळ्याच्या कामावर ८६.६५ लाख रूपये खर्च झाले असल्याची माहिती मिळाली आहे. सन २०१५-१६ वर्षात शेततळ्याची १७८ कामे पूर्ण झाली असून चालू वर्षात शेततळ्यांची १७ कामे प्रगतीपथावर आहे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाने गावागावात माहिती दिली. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा शेततळ्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागेल त्याला बोळीसाठी ४७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त राज्य शासनाने कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला बोळी’ ही योजना सन २०१६-१७ पासून सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प वन कायद्याच्या जाचक अटीमुळे रखडले आहेत. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांची प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला बोळी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार बोडीच्या लाभासाठी आतापर्यंत ४७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.