शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

रेगडी तलावात २४ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क घोट : रेगडी येथील कन्नमवार जलाशयात २४.४५ टक्के जलसाठा साचला आहे. तलाव भरण्यासाठी पुन्हा पावसाची आवश्यकता ...

ठळक मुद्देमोठ्या पावसाची प्रतीक्षा : हजारो हेक्टर क्षेत्राला पुरविते सिंचन सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : रेगडी येथील कन्नमवार जलाशयात २४.४५ टक्के जलसाठा साचला आहे. तलाव भरण्यासाठी पुन्हा पावसाची आवश्यकता आहे.घोट परिसरातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून चामोर्शी, भेंडाळा, घोट परिसरातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे सदर तलाव किती प्रमाणात भरला याबाबत शेतकरी व सामान्य नागरिकांमध्ये उत्कंठा राहते. चामोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा या तलावाच्या माध्यमातून मिळते. सदर तलाव दिना नदीवर बांधण्यात आला आहे. त्यामुळे दिना नदी वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर तलाव लवकरच भरते. मात्र अजूनपर्यंत जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नाही. आजपर्यंत झालेला पाऊस जमिनीमध्येच जिरला. त्यामुळे दिना नदी अजूनही पाहिजे तेवढी वाहण्यास सुरूवात झाली नाही. त्यामुळे तलावाची पातळी सुद्धा वाढू शकली नाही.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने जुलै महिन्यापासून दमदार पावसाला सुरूवात होते. आॅगस्ट महिन्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहते. मात्र यावर्षी आता जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपूनही अजूनपर्यंत दमदार पावसाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे तलाव अजूनही अर्धाही भरला नाही. तलावात १८.७४ टक्के हा जुना जलसाठा होता तर यावर्षीच्या पावसाने ५.७१ टक्के वाढ होऊन तलाव २४.४५ टक्के भरले आहे. तलाव पूर्ण भरण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.मामा तलाव कोरडे ठाकजुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे मामा तलाव अजूनही कोरडे ठाक आहेत. काही मध्यम तलावांमध्ये मागील वर्षीचे पाणी उपलब्ध होते. तेवढाच जलसाठा यावर्षी सुद्धा शिल्लक आहे. नवीन पाण्याची मात्र भर पडली नाही. मामा तलाव व बोड्यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी पुरविले जाते. त्यामुळे तलाव व बोड्या भरणे आवश्यक आहे. धानाचे पºहे रोवण्याजोगे झाली आहेत. मात्र पाऊस नसल्याने अजूनपर्यंत धान रोवणीला सुरूवात झाली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांनी धान रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प