शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

नागपूरसाठी २१५ रूपये तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:57 AM

एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देशिवशाहीचेही तिकीट महागले : १८ टक्के भाडेवाढीचा एसटी प्रवाशांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.सातत्याने वाढत असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी आर्थिक अडचणीत आली होती. त्याचबरोबर नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढही देण्यात आली. वाढत्या महागाईसोबत आर्थिक ताळमेळ जुडविण्यासाठी एसटीला भाडेवाढ करणे आवश्यक झाले होते. त्यानुसार शुक्रवारी १८ टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली. ही भाडेवाढ लागू सुध्दा करण्यात आली आहे. गडचिरोली आगारातून सर्वाधिक बसेस नागपूरसाठी सुटतात. यापूर्वी नागपूरचे प्रवास भाडे १८४ रूपये होते. भाडेवाढीनंतर ते आता २१५ रूपये करण्यात आले आहे. नवीन भाडेवाढीनुसार अहेरी-चंद्रपूरचे तिकीट १५५ रूपये, अहेरी-गोंडपिपरीमार्गे नागपूरचे तिकीट ३५० रूपये, अहेरी-गडचिरोली ८५ रूपये व अहेरी-यवतमाळ ३३८ रूपये करण्यात आली आहे.गडचिरोली आगारातून नागपूरसाठी शिवशाही बसेस सोडल्या जातात. शिवशाही बसेसच्याही भाड्यात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गडचिरोली-नागपूरचे शिवशाहीचे तिकीट २७३ रूपये होते. ते आता ३२० रूपये करण्यात आले आहे. गडचिरोली आगारातून शिवशाही बससेवा उन्हाळ्यात सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शिवशाहीला काही प्रमाणात प्रवाशी मिळत होते. तरीही खासगी बसच्या तुलनेत भाडे अधिक आहे, अशी तक्रार होती. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे वातानुकूलित वाहनाची प्रवाशांना पाहिजे तेवढी आवश्यकता नाही. अशातच भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे शिवशाहीला प्रवाशी मिळविताना चांगलीच अडचण जाणार आहे.एसटीनेही भाडेवाढ करीत महागाईत आणखी भर टाकली आहे. दुर्गम भागातील नागरिक, विद्यार्थी यांनाही भाडेवाढीचा फटका बसणार आहे.चिल्लरचा प्रश्न मिटविलायापूर्वी एसटीचे तिकीट अगदी किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे होते. त्यामुळे एक ते दोन रूपयांच्या चिल्लरचा तुटवडा निर्माण होत होता. प्रवाशी वाहकाच्या हातात सरळ ५० किंवा १०० ची नोट ठोकून तिकीटाचा हिशोब वगळता पैसे परत मागत होते. वाहकाकडे चिल्लर राहत नसल्याने बºयाच वेळा वादही होत होते. कित्येक वेळा चिल्लरसाठी एसटी बसथांब्यावर काही वेळ थांबवावी लागत होती. नवीन भाडेवाढीत चिल्लरचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाच रूपयांच्या पटीने भाववाढ करण्यात आली आहे. यानंतरची तिकीट १५, २०, २५ रूपये अशा स्वरूपात राहणार आहे. पाचच्या पटीतील पैसे वाहक सहज उपलब्ध करून देऊ शकेल. त्यामुळे चिल्लरसाठी होणारे वाद संपुष्टात येतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ