१९ महिन्यांत २४२ नागरिकांनी केल्या आत्महत्या
By Admin | Updated: August 21, 2015 01:53 IST2015-08-21T01:53:18+5:302015-08-21T01:53:29+5:30
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेला तणाव, कर्ज, कौंटुंबिक व इतर कारणांमुळे जिल्हाभरात मागील १९ महिन्यांत २४२ नागरिकांनी आत्महत्या केली

१९ महिन्यांत २४२ नागरिकांनी केल्या आत्महत्या
पणजी : वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जॅकीस व उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक हे तिन्ही अधिकारी आता आयएएस बनले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने खात्यांतर्गत बढती समितीची गुरुवारी पर्वरीत बैठक घेतली आणि त्या वेळी गोवा नागरी सेवेतील या तिन्ही अधिकाऱ्यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. याबाबतची अधिसूचना जारी होण्यास आणखी एक-दोन महिने लागतील, असे सूत्रांनी सांगितले.
गोवा नागरी सेवेतील तिघा अधिकाऱ्यांचा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये समावेश होण्याची घटना प्रथमच घडत
आहे. यापूर्वी आत्माराम देशपांडे व अरविंद गावस या गोव्याच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आयपीएसमध्ये झालेला आहे.
दरम्यान, आयएएसमध्ये समावेश झाल्यानंतर अधिकाऱ्यांची गोव्याबाहेर काही वर्षांसाठी बदली केली जाते. त्यानुसार सेवा बजावण्यासाठी देसाई, जॅकीस व नाईक यांना यापुढे दुसऱ्या राज्यात पाठविले
जाणार आहे. (खास प्रतिनिधी)