शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

जिल्हाभरात १८ टक्के पावसाची पडली तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

जून महिन्यात २१०.९ मिमी अपेक्षित पाऊस होता. प्रत्यक्षात यावर्षी १९५ मिमी पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ९२.४ टक्के एवढी आहे. १ ते २६ जुलै या कालावधीत ३५८.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र केवळ २७१.८ मिमी पाऊस पडला आहे. जुलै महिन्यात अपेक्षित पावसाच्या ७५.६० टक्केच पाऊस झाला आहे.

ठळक मुद्दे४६६ मिमी पावसाची नोंद : धान रोवणीची कामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात पडणाऱ्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत १८ टक्के पाऊस कमी पडला आहे. धानोरा, कोरची, गडचिरोली, कुरखेडा या तालुक्यांमध्ये पावसाची तूट अधिक असल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. १ जूनपासून प्रशासनामार्फत पावसाची नोंद घेण्यास सुरूवात होते. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस पडला. तसेच पहिला पाऊस पडल्यानंतर काही दिवस उसंत दिल्याने पेरणीची कामे नियोजितवेळी आटोपली. पेरणीची कामे संपल्यानंतर धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. धान रोवणीसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज भासत असल्याने शेतकरी जुलै महिन्यापासून मोठ्या पावसाची अपेक्षा करते. मात्र यावर्षी जुलै महिन्यात फारसा पाऊस झाला नाही. अजुनही काही परिसरात पुरेसा पाऊस झाला नसल्याने धान रोवणीची कामे खोळंबली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशाच शेतकºयांचे धानाचे रोवणे सुरू आहेत.जून महिन्यात २१०.९ मिमी अपेक्षित पाऊस होता. प्रत्यक्षात यावर्षी १९५ मिमी पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ९२.४ टक्के एवढी आहे. १ ते २६ जुलै या कालावधीत ३५८.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र केवळ २७१.८ मिमी पाऊस पडला आहे. जुलै महिन्यात अपेक्षित पावसाच्या ७५.६० टक्केच पाऊस झाला आहे. १ जून ते २६ जुलैपर्यंत ५६९.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ४६६.७ टक्के पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या १८ टक्के कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे.पाच तालुक्यांमध्ये कमी पाऊसकाही तालुक्यांमध्ये ६० टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर काही तालुक्यांमध्ये मात्र १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कमी पाऊस झालेल्यांमध्ये गडचिरोली तालुक्यात अपेक्षित पावसाच्या ६३.७ टक्के, कुरखेडा ६७.६, आरमोरी ७४.१, एटापल्ली ७८, धानोरा ४८.८, कोरची ४८, देसाईगंज तालुक्यात ६७.७ टक्के पाऊस पडला आहे. सिरोंचा ११८ टक्के, मुलचेरा तालुक्यात ११२ व भामरागड तालुक्यात १०४ टक्के पाऊस पडला आहे.कापूस व सोयाबीन पिके जोरात असून निंदनाची कामे सुरू आहेतकापूस, सोयाबिन, तूर, तीळ या पिकांना कमी प्रमाणात पावसाची गरज भासते. यावर्षी तुटक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे ही पिके जोरात सुरू आहे. काही भागातील शेतकरी निंदणाची कामे करीत आहेत. मागील वर्षी सातत्त्याने पाऊस पडल्याने कापूस, सोयाबिन पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. यावर्षी मात्र ही पिके चांगली आहेत. दुसरीकडे जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अजुनपर्यंत तलाव, बोड्या भरल्या नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. काही शेतकरी तर तलावात साचलेले पाणी सोडून रोवणीची कामे करीत आहेत. पावसाची तुट वाढल्यास धान पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती