शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा; धानोरा तालुक्यातील घटना

By संजय तिपाले | Updated: December 20, 2023 21:46 IST

२९ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविले

संजय तिपाले, गडचिरोली: तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना २० डिसेंबरला दुपारच्या जेवणातून  विषबाधा झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ७७ जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून २९ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी दाखल झाल्याने खाटा अपुऱ्या पडल्या, यंत्रणेचीही तारांबळ उडाली.

तालुका मुख्यालयापासून ४ किलोमीटरवरील सोडे या गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत  माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात.

 सध्या ३९० मुली व दहा मुले असे एकूण ३९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ३७९ विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात. दरम्यान, २० डिसेंबरला ३५८ विद्यार्थी उपस्थित होते. दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण भात    असा मेन्यू होता, सोबत गाजरी खाण्यासाठी दिले होते. जेवण केल्यानंतर अर्ध्या तासांनी काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. पाहता- पाहता ही संख्या १०६ वर पोहोचली. शाळा प्रशासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती अधिकच खालावल्याने २९ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. 

प्रकल्पाधिकाऱ्यांची तातडीने धाव

गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्पाधिकारी राहुल मीणा यांनी या घटनेनंतर सोडे येथे आश्रमशाळेला भेट दिली. घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात पोहोचले व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर ते जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठीही पोहोचले. यावेळी समवेत सहायक प्रकल्पाधिकारी अनिल सोमनकर व कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हा रुग्णालयातून टीम पाचारण

या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते हे तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसह धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.  जिल्हा रुग्णालयातही यंत्रणा सज्ज असून विद्यार्थ्यांना उपचारात कुठलीही निष्काळजी होणार नाही, यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सखाराम हिचामी हे अधिकारी तळ ठोकून आहेत. 

अन्न नमुने तपासणीसाठी...

दरम्यान, या घटनेनंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली, अन्न नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईल, पण अन्नातूनच ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfood poisoningअन्नातून विषबाधा