शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा; धानोरा तालुक्यातील घटना

By संजय तिपाले | Updated: December 20, 2023 21:46 IST

२९ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविले

संजय तिपाले, गडचिरोली: तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना २० डिसेंबरला दुपारच्या जेवणातून  विषबाधा झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ७७ जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून २९ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी दाखल झाल्याने खाटा अपुऱ्या पडल्या, यंत्रणेचीही तारांबळ उडाली.

तालुका मुख्यालयापासून ४ किलोमीटरवरील सोडे या गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत  माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात.

 सध्या ३९० मुली व दहा मुले असे एकूण ३९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ३७९ विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात. दरम्यान, २० डिसेंबरला ३५८ विद्यार्थी उपस्थित होते. दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण भात    असा मेन्यू होता, सोबत गाजरी खाण्यासाठी दिले होते. जेवण केल्यानंतर अर्ध्या तासांनी काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. पाहता- पाहता ही संख्या १०६ वर पोहोचली. शाळा प्रशासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती अधिकच खालावल्याने २९ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. 

प्रकल्पाधिकाऱ्यांची तातडीने धाव

गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्पाधिकारी राहुल मीणा यांनी या घटनेनंतर सोडे येथे आश्रमशाळेला भेट दिली. घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात पोहोचले व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर ते जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठीही पोहोचले. यावेळी समवेत सहायक प्रकल्पाधिकारी अनिल सोमनकर व कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हा रुग्णालयातून टीम पाचारण

या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते हे तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसह धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.  जिल्हा रुग्णालयातही यंत्रणा सज्ज असून विद्यार्थ्यांना उपचारात कुठलीही निष्काळजी होणार नाही, यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सखाराम हिचामी हे अधिकारी तळ ठोकून आहेत. 

अन्न नमुने तपासणीसाठी...

दरम्यान, या घटनेनंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली, अन्न नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईल, पण अन्नातूनच ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfood poisoningअन्नातून विषबाधा