२४४ जागांसाठी १०४ मतदान केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:27+5:302021-01-14T04:30:27+5:30
येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता ४३ ग्रामपंचायतीमधील ३५३ जागांकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र खेडेगाव गट ग्रामपंचायत निवडणूक ...

२४४ जागांसाठी १०४ मतदान केंद्रे
येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता ४३ ग्रामपंचायतीमधील ३५३ जागांकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र खेडेगाव गट ग्रामपंचायत निवडणूक अविरोध पार पडली; तर भगवानपूर, कातलवाडा व आंधळी (सोनपूर)येथील काही जागा अविरोध, तर उर्वरित जागेकरिता नामांकनच दाखल करण्यात न आल्याने या तीन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. तसेच ३५३ जागांचा निवडणूक कार्यक्रम घोषित होता. यापैकी १५ जागांवर एकही नामांकन दाखल करण्यात आले नाही, तर ९४ जागांकरिता एक-एकच नामांकन असल्याने या जागेवर अविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्षात ४३ पैकी ३९ ग्रामपंचायतींमधील २४४ जागांकरिताच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याकरिता प्रशासनाकडून १०४ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती येथील तहसील प्रशासनाने दिली आहे.