शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

१०० वर गावे पोलीस पाटलाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची जवळपास १ हजार ५१४ पदे मंजूर आहेत. यापैकी ९५० वर पदे भरण्यात आली असून २०० वर पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देरिक्त पदांचा अनुशेष कायम : नक्षल्यांच्या भीतीमुळे दुर्गम भागात उमेदवार मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस प्रशासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटलांच्या रिक्तपदांचा अनुशेष गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. नक्षली दहशत, संवेदनशील भाग व अत्यल्प मानधन आदी कारणांमुळे जिल्ह्यात पोलीस पाटलांची १०० वर पदे रिक्त आहेत. परिणामी या गावांचा कारभार पोलीस पाटलांविनाच गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची जवळपास १ हजार ५१४ पदे मंजूर आहेत. यापैकी ९५० वर पदे भरण्यात आली असून २०० वर पदे रिक्त आहेत.गावातील शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासोबतच गावातील तंटे गावातच मिटविण्याच्या कामातही पोलीस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असते. गावात घडलेल्या कुठल्याही गुन्ह्यांची तसेच घटनांची माहिती पोलीस पाटलांमार्फत पोलीस प्रशासनाला दिली जाते. पोलीस ठाणे, पोेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शांतता व सुव्यवस्थेबाबत पोलीस पाटलांशी नेहमी संवाद असतो. याशिवाय अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पाटील पोलीस प्रशासनाला मदत करीत असते. सार्वत्रिक निवडणुकीच्या कामातील सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सुद्धा पोलीस पाटील सहकार्य करीत असते. त्यामुळे गावात पोलीस पाटलाचे पद अतिशय महत्त्वपूर्ण आहे.गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी हे सहा उपविभाग असून या सहा उपविभागाअंतर्गत १६०० वर गावे आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही उपविभागातील पोलीस पाटलांचे रिक्तपदे भरण्यासाठी संबंधित उपविभागाला आयुक्त नागपूर कार्यालयातून मंजुरी घ्यावी लागते. रिक्त असलेल्या पोलीस पाटलांचे रोस्टरही मंजूर करून घ्यावे लागते. ही सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने उपविभागस्तरावर केली जाते. मात्र तीन हजार रुपये इतक्या अत्यल्प मानधनामुळे सध्याची युवा पिढी पोलीस पाटलाचे पद सांभाळण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.एक पोलीस पाटील सांभाळतो अनेक गावेगडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी हे चार तालुके शहरी भागालगत आहेत. तर इतर आठ तालुका नक्षल प्रभावित, अतिदुर्गम भागात मोडतात. पोलीस पाटील पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवार मिळणे आवश्यक आहे, मात्र कुरखेडा, अहेरी, एटापल्ली या तीन उपविभागात नक्षली दहशत व अत्यल्प मानधनामुळे या पदासाठी उमेदवार अर्ज भरण्यास तयार होत नाही. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. मात्र उमेदवार तयार होत नसल्याने पोलीस पाटलाच्या रिक्तपदाचा अनुशेष कायम राहतो.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास