१० हजार ८७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा
By Admin | Updated: June 5, 2015 01:35 IST2015-06-05T01:35:27+5:302015-06-05T01:35:27+5:30
२०१५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे तसेच कीटकनाशकांसाठी ऐनवेळी धावपळ करावी लागू नये, ...

१० हजार ८७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा
कृषी केंद्रात उपलब्ध : जि. प. च्या कृषी विभागाची खरीप हंगामाची तयारी पूर्ण
गडचिरोली : २०१५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे तसेच कीटकनाशकांसाठी ऐनवेळी धावपळ करावी लागू नये, या हेतूने जि. प. च्या कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. जि. प. कृषी विभागाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला भात, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद व किड आदी पिकांच्या दहा हजार ८७.०३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
जि. प. च्या कृषी विभागाने भात, सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद व तीळ आदी पिकांच्या बियाण्यांच्या मागणीचे नियोजन केले आहे. १७ हजार ५४ क्विंटल सार्वजनिक व १२ हजार ६५७.५० क्विंटल खासगी प्रणालीद्वारे नियोजन केले आहे. कृषी आयुक्तालयाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याला वरील सर्व पिकांचे आठ हजार ५४७ क्विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर केले आहे. यापैकी सार्वजनिक प्रणालीमार्फत तीन हजार २१९ क्विंटल व खासगी प्रणालीमार्फत सहा हजार ८६८.०३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याला भात पिकाच्या नऊ हजार ८४३.८५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. सोयाबीन २४० क्विंटल, तूर ३० किलो, कापूस २.८८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)