बोरी येथे तीन पुंजणे जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:43+5:30

कोरची तालुक्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पुंजण्यांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकरी धानाच्या पुंजन्यांची जागल करीत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सीताबाई हिडामी यांच्या पुंजन्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावली होती. यामध्ये त्यांचे जवळपास साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले.

- | बोरी येथे तीन पुंजणे जळाले

बोरी येथे तीन पुंजणे जळाले

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : आगी लागण्याच्या घटना सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुक्यात पुंजन्यांना आगी लागण्याच्या घटना घडतच असून २ डिसेंबरच्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान पुन्हा कोरचीपासून एक किमी अंतरावर असलेल्या बोरी येथील तीन शेतकऱ्यांच्या पुंजण्यांना आगी लागल्या.
कोरची तालुक्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पुंजण्यांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकरी धानाच्या पुंजन्यांची जागल करीत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सीताबाई हिडामी यांच्या पुंजन्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावली होती. यामध्ये त्यांचे जवळपास साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ताजी असतानाच २ डिसेंबरच्या रात्री पुन्हा बोरी येथील तीन शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजन्यांना अज्ञात लोकांनी आगी लावल्या. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत रफीक हबीब शेख यांच्या चार एकरातील पुंजणे, फिरोज मुस्ताक शेख यांची चार एकरची पुंजणे व ईश्वर सीताराम राऊत यांच्या एक एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लागली. हातात आलेले धान नष्ट होताना बघून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती