शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

भारतीय खेळाडूंची कठीण परीक्षा, अखेरचा साखळी सामना : माजी विजेत्या घानाविरुद्ध आज लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:37 IST

पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाने सर्वांची मने जिंकली असून, गुरुवारी ‘अ’ गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना माजी विजेत्या घानाविरुद्ध खेळेल.

नवी दिल्ली : पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाने सर्वांची मने जिंकली असून, गुरुवारी ‘अ’ गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना माजी विजेत्या घानाविरुद्ध खेळेल. घानासारख्या कसलेल्या संघाविरुद्ध भारताच्या युवा खेळाडूंची कठीण परीक्षा होईल.स्पर्धेतील सलामीच्या लढतीत अमेरिकाविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताच्या युवा संघाने कोलंबियाविरुद्ध जबरदस्त झुंज दिली. कोलंबियाविरुद्ध शानदार खेळ करताना भारतीयांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यातही पराभव झाला असला, तरी भारतीय युवा खेळाडूंनी आम्ही मोठ्या संघांविरुद्धही आव्हान निर्माण करु शकतो, हे दाखवून दिले. प्रशिक्षक लुईस नॉर्टन डि मातोस यांनी आखलेल्या बचावात्मक रणनीतीचा भारतीय संघाने कोलंबियाविरुध्द चांगल्याप्रकारे अवलंब केला. जर, का नशिबाने साथ दिली असती, तर भारतीय युवांनी या सामन्यात कोलंबियाविरुद्ध धक्कादायक निकालही नोंदवला असता.दरम्यान, घानाविरुद्धही हाच जोश कायम ठेवून कोलंबियाविरुद्ध केलेला खेळ फ्ल्यूक नव्हता हे सिद्ध करण्याचे आव्हान भारतीय युवांपुढे असेल. दुसरीकडे, गटातील सर्वात ताकदवान संघ असलेल्या घानाविरुद्ध आव्हान उभे करणे भारतासाठी सहज शक्य होणार नाही. या सामन्यात तेच संभाव्य विजेते असतील. ‘अ’ गटातून अमेरिकेने सलग दोन विजय मिळवत बाद फेरी गाठली असून, कोलंबिया आणि घाना यांचे प्रत्येकी ३ गुण आहेत. या दोन्ही संघांना बाद फेरी गाठण्यासाठी आपल्या अखेरच्या गटसाखळी सामन्यात विजय अनिवार्य आहे. त्याचवेळी, भारताच्या खात्यात एकही गुण नसून जरी विजय मिळवण्यात भारत यशस्वी ठरला, तरी बाद फेरी त्यांच्यासाठी धूसरच असेल.आतापर्यंतच्या रणनीतीनुसार केलेल्या खेळावर प्रशिक्षक मातोस भारतीय युवांवर समाधानी आहेत. आक्रमकतेवर भारतीयांना आणखी सुधारणा करावी लागेल, त्यांनी म्हटले आहे. गोलरक्षक धीरज सिंग भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, अन्वर अली, नमितदेशपांडे यांनीही बचावफळीत चांगले प्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आणि कोलंबियाच्या प्रशिक्षकांनी अन्वरच्या खेळाचे कौतुकही केले. त्याचवेळी, भारताला आक्रमकांकडूनही सर्वाधिक आशा असेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल