शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

जिल्हाबंदीमुळे शेतकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 5:00 AM

जिल्हाबंदीच्या निर्णयानंतर गडचिराेली जिल्ह्याच्या आंतरजिल्हा मार्गांवर तसेच तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातही येऊ दिले जात नाही. गडचिराेली जिल्ह्याची सीमा चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया जिल्हे व तेलंगणा तसेच छत्तीसगड राज्याला लागून आहे. यातील प्रमुख आंतरजिल्हा मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देखरीपपूर्व मशागतीची कामे रखडली : सिमेवर उभारल्या आहेत पाेलीस चाैक्या

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलपासून जिल्हाबंदी करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली आहे. काही शेतकऱ्यांची शेती नजीकच्या चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात आहे. जिल्हाबंदीमुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. जिल्हाबंदीच्या निर्णयानंतर गडचिराेली जिल्ह्याच्या आंतरजिल्हा मार्गांवर तसेच तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातही येऊ दिले जात नाही. गडचिराेली जिल्ह्याची सीमा चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया जिल्हे व तेलंगणा तसेच छत्तीसगड राज्याला लागून आहे. यातील प्रमुख आंतरजिल्हा मार्गांवर पाेलीस चाैक्या बसविण्यात आल्या आहेत. ई-पास असल्याशिवाय सहजासहजी प्रवेश दिला जात नाही. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. खरीपपूर्व हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली असल्याने शेतावर जाणे आवश्यक झाले आहे. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नसल्याने शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. कापूस बियाणे खरेदी रखडलीचामाेर्शी तालुक्यात सर्वाधिक कापूस पिकाची लागवड हाेते. या तालुक्यातील शेतकरी कापसाची बियाणे गाेंडपिंपरी तालुक्यातून किंवा तेलंगणा राज्यातून खरेदी करून आणतात. गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत त्या ठिकाणी बियाणे स्वस्त मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने त्याच ठिकाणी बियाणे खरेदीसाठी शेतकरी जातात. मात्र यावर्षी जिल्हाबंदी असल्याने बियाणे खरेदी रखडली आहे. अनेक शेतकरी जिल्हाबंदी उठविण्याची प्रतीक्षा करीत आहेत. 

पावसाळा आता जवळ आला आहे. सर्वच शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे करीत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. त्यांची कामे ठप्प पडली आहेत. एसपी कार्यालयातून केवळ वैद्यकीय कारणासाठीच दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली जात आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना ये-जा करण्याची मुभा द्यावी.- मधुकर नीलमवार, शेतकरी.

आमच्या परिसरातील बहुतांश शेतकरी तेलंगणा राज्यातूनच कापूस बियाणे व किटकनाशके खरेदी करून आणतात. त्याठिकाणी गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत स्वस्त दरात बियाणे व किटकनाशके उपलब्ध हाेतात. यावर्षी जिल्हाबंदी असल्याने अजुनपर्यंत बियाणे व किटकनाशके खरेदी केली नाहीत. जिल्हाबंदीतून सुट मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. - बाबुराव बट्टे, शेतकरी.

मागील वर्षी सातबारावर मिळत हाेता ई-पास - मागील वर्षी याच कालावधीत जिल्हाबंदी लागू हाेती. मात्र शेतीचा हंगाम जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारावर ई-पास दिली जात हाेती. ई-पास काढण्याची प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे सातबारा धरून चाैकीजवळ जात हाेते. शेतकऱ्यांच्या हंगामाचा विचार करून पाेलीस विभागही त्यांना जाण्याची परवानगी देत हाेता. यावर्षीही अशाच प्रकारची परवानगी मिळण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहे. - काही कर्मचारी मात्र या सातबाराचा दुरूपयाेग करून ये-जा करीत हाेते. असा दुरूपयाेग हाेणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती