शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयातलं विषारी सत्य

By admin | Updated: April 26, 2017 17:30 IST

अ‍ॅल्युमिनियममध्ये विषारी घटक असतात जे मानवाच्या आरोग्यला हानिकारक असतात हे काही आज कालचं संशोधन नसून जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासातून हे सत्य पुढे आलं आहे.

प्रत्येक बाबतीत पैशानं परवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून कसं चालेल? आणि प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा काय परवडतं यापेक्षाही काय चांगलं याचा विचार व्हायला हवा.आता आपल्या स्वयंपाकघरातल्या अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचंच घ्या ना. आता तुम्ही म्हणाल त्या बिचाऱ्या अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्याचा आणि आरोग्याचा कोणता आलाय संबंध? पण संबंध आहे.

 

 

 

 

अनेक संशोधनातून हे सिध्द झालं आहे की अ‍ॅल्युमिनियमची भांडी आरोग्यास हानिकारक असतात. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक करताना भांड्यामधील अ‍ॅल्युमिनियम हे पदार्थात आणि पाण्यात मिसळतं आणि खाण्या-पिण्याद्वारे ते आपल्या पोटात जाऊन रक्तप्रवाहात मिसळतं. आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात ते साठून राहतं. त्याचा परिणाम अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. कोणाला हायपर अ‍ॅसिडिटी, अल्सर, अपचन होतं तर कोणाला इसब, काळे डाग, कोंडा, अत्यंत दाह यासारख्या त्वचाविकारांना सामोरं जावं लागतं. तर कोणाला अ‍ॅस्टोपोरोसिससारखे आजार जडतात. पण सर्वांमध्ये सारखा दिसून येणारा परिणाम म्हणजे अ‍ॅल्युमिनियममुळे हाडांची वाढ खुंटते. अ‍ॅल्युमिनियममध्ये विषारी घटक असतात जे मानवाच्या आरोग्यला हानिकारक असतात हे काही आज कालचं संशोधन नसून जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासातून हे सत्य पुढे आलं आहे. आणि म्हणूनच विकसित देशांनी आपल्या स्वयंपाक घरातून अ‍ॅल्युमिनियमची भांडी काढून टाकून नॉन स्टिक कूकवेअर आणले. पण विकसनील देशात मात्र अजूनही पैशाला परवडतात म्हणून अ‍ॅल्युमिनियमची भांडी घरापासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत सर्वत्र वापरली जात आहेत. आणि ज्यांना परवडतं ते मग नॉन स्टिक भांडी वापरू लागले आहेत.

 

                              पण नॉनस्टिकची भांडी वापरतानाही ती जपून वापरावी लागतात. कारण या भांड्यांना टेफलॉन कोटिंग असतं. त्याच्याखाली अ‍ॅल्युमिनियम असत. हे टेफलॉन अन्नपदार्थांचा आणि अ‍ॅल्युमिनियमच्या संपर्काला रोखतं. पण हे कोटिंग निघालं की मात्र अ‍ॅल्युमिनियमशी अन्नघटकांचा संबंध येवून ते पदार्थात मिसळू लागतं. म्हणून नॉनस्टिक भांडी वापरताना त्यांचं कोटिंग सांभाळणं गरजेचं असतं. ही भांडी घासतांना टोकदार दातांच्या घासण्यांनी ,स्टीलच्या घासण्यांनी घासू नये. मऊ किंवा नॉयलॉनच्या घासण्यांनी ही भांडी घासली तर हे कोटिंग टिकू शकतं. पण नॉंनस्टिक भांड्यातील टेफलॉन या घटकाबद्दलही एक संशोधन झालं असून ते संशोधन सांगतं की हे टेफलॉन जर कायम आपल्या वापरात असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमी होवून किडनीचे आजार होवू शकतात.शिवाय कर्करोगाचीही शक्यता असते. नॉनस्टिक भांडे जर मोठ्या आचेवर तापवले तर हे टेफलॉन घातक ठरू शकतं. म्हणून म्हणून पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ नॉनस्टिक भांडे मोठ्या आचेवर ठेवू नये असं सांगितलं जातं. नॉनस्टिक भांडे वापरताना ते खरचटून त्यावरचं कोटिंग निघू नये म्हणून लाकडाचे किंवा प्लॅस्टिकचे चमचे वापरले जातात. पण हे चमचे सारखे स्वयंपाकासाठी वापरले आणि ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर मात्र अस्वच्छतेमुळे या चमच्यांमुळेही जंतूसंसर्ग होतो.त्यामुळे अ‍ॅल्युमिनियमला उत्तम पर्याय म्हणजे लोखडी कढया आणि तवे. स्टीलची भांडी आणि चमचे. या अशा भांड्याद्वारे आपण आपल्या रोजच्या आयुष्यातून आपल्या पोटात अन्नाद्वारे जाणारा विषप्रवेश नक्कीच रोखू शकतो.