शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

पांढऱ्या तांदळाबाबत संशोधकांनी दिला इशारा; दररोज सेवन करणं ठरू शकतं घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 15:17 IST

भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही.

भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही. अनेकदा आहारतज्ज्ञ थंडीमध्ये भात न खाण्याचा सल्ला देतात. परंतु भात हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येक घरामध्ये दररोज तयार करण्यात येतो. खरं तर भातामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिजं आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. त्याचे शरीराला अनेक फायदेही आहेत. परंतु यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती अधिक प्रमाणात पांढरा तांदूळ खातात. त्यांना टाइप-2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. 

अनेक संशोधनातून या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे की, दररोज भात खाल्याने आर्सेनिकसारखे विषारी रसायन शरीरामध्ये प्रवेश करते. ज्यामुळे कॅन्सर, हृदय रोग आणि डायबिटीज यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. संशोधकांच्या मते, भातामध्ये दुसऱ्या गोष्टींच्या तुलनेत 10 ते 20 टक्के जास्त आर्सेनिक रसायन आढळून येतं. ज्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

जर तुम्ही ब्राउन राइस खात असाल तर त्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम अजिबात दिसून येत नाहीत. अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये पांढऱ्या तांदळाचाच वापर करतात. जर तुम्हीही जास्त प्रमाणात भाताचे सेवन करत असाल तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया शरीराच्या अनेक समस्यांबाबत...

1. लठ्ठपणाचा वाढता धोका

जर तुम्ही नियमितपणे पांढऱ्या तांदळाचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. अशातच भात खाल्याने वजन वेगाने वाढते. 

2. पोटाच्या समस्या 

पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायबर्सचे योगदान फार महत्त्वाचे असते. परंतु जर तुम्ही तांदूळ खात असाल तर त्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या होऊ शकतात. तांदळामध्ये फायबर्स नसतात. ज्यामुळे पोटामध्ये पचनाशी निगडीत समस्यांचाही सामना करावा लागतो. 

3. डायबिटीजचा धोका 

डायबिटीज होण्याची अनेक कारणं असतात, परंतु जर तुम्ही दररोज आहारात तांदळाचा समावेश करत असाल तर त्यामुळे तुम्हालाही डायबिटीजचा धोका संभवतो. तांदळाचे सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेची पातळीही वाढते. 

4. हाडांसाठीही हानिकारक

तांदूळ हाडांच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात. पांढऱ्या तांदळामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण फार कमी असते. ज्यामुळे याचे सेवन केल्याने हाडांना नुकसान पोहोचते. परिणामी हाडं ठिसूळ होतात. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य