शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

पांढऱ्या तांदळाबाबत संशोधकांनी दिला इशारा; दररोज सेवन करणं ठरू शकतं घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 15:17 IST

भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही.

भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही. अनेकदा आहारतज्ज्ञ थंडीमध्ये भात न खाण्याचा सल्ला देतात. परंतु भात हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येक घरामध्ये दररोज तयार करण्यात येतो. खरं तर भातामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिजं आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. त्याचे शरीराला अनेक फायदेही आहेत. परंतु यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती अधिक प्रमाणात पांढरा तांदूळ खातात. त्यांना टाइप-2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. 

अनेक संशोधनातून या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे की, दररोज भात खाल्याने आर्सेनिकसारखे विषारी रसायन शरीरामध्ये प्रवेश करते. ज्यामुळे कॅन्सर, हृदय रोग आणि डायबिटीज यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. संशोधकांच्या मते, भातामध्ये दुसऱ्या गोष्टींच्या तुलनेत 10 ते 20 टक्के जास्त आर्सेनिक रसायन आढळून येतं. ज्यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

जर तुम्ही ब्राउन राइस खात असाल तर त्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम अजिबात दिसून येत नाहीत. अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये पांढऱ्या तांदळाचाच वापर करतात. जर तुम्हीही जास्त प्रमाणात भाताचे सेवन करत असाल तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया शरीराच्या अनेक समस्यांबाबत...

1. लठ्ठपणाचा वाढता धोका

जर तुम्ही नियमितपणे पांढऱ्या तांदळाचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. अशातच भात खाल्याने वजन वेगाने वाढते. 

2. पोटाच्या समस्या 

पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायबर्सचे योगदान फार महत्त्वाचे असते. परंतु जर तुम्ही तांदूळ खात असाल तर त्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या होऊ शकतात. तांदळामध्ये फायबर्स नसतात. ज्यामुळे पोटामध्ये पचनाशी निगडीत समस्यांचाही सामना करावा लागतो. 

3. डायबिटीजचा धोका 

डायबिटीज होण्याची अनेक कारणं असतात, परंतु जर तुम्ही दररोज आहारात तांदळाचा समावेश करत असाल तर त्यामुळे तुम्हालाही डायबिटीजचा धोका संभवतो. तांदळाचे सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेची पातळीही वाढते. 

4. हाडांसाठीही हानिकारक

तांदूळ हाडांच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात. पांढऱ्या तांदळामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण फार कमी असते. ज्यामुळे याचे सेवन केल्याने हाडांना नुकसान पोहोचते. परिणामी हाडं ठिसूळ होतात. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य