शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही केमिकलयुक्त भात तर खात नाही ना? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 15:56 IST

भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत.

भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट असतात. परंतु, हा समज अत्यंत चुकीचा असून भातामध्ये कोणत्याही प्रकारचे फॅट्स नसतात. भात पचण्यास हलका असतो आणि कार्बोहायड्रेटही असतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात भात खात असाल तर सावध व्हा. कारण भातामध्ये एक असं रसायन असतं जे शरीरासाठी घातक असतं. या रसायनाचं नाव आहे आर्सेनिक. हे एक रासायनिक तत्व आहे ज्यामध्ये स्किन कॅन्सरसह अनेक गंभीर रोग होण्याच्या शक्यता असते.

आरोग्यासाठी घातक ठरतं आर्सेनिक रासायनिक तत्व 

क्वीन यूनिवर्सिटी बेलफास्टमधील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, तांदूळ शिजवताना त्यामध्ये आर्सेनिक तयार होतं. वास्तविक पाहता धान्यामध्ये असं घातक रसायन असण्याचं कारण धान्यांवर फवारण्यात येणारी किटकनाशक असतात. यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अॅन्डी मेहरर्ग यांचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तींच्या आहारात तांदळाचा समावेश जास्त असतो, त्यांनी या घातक रासायनिक पदार्थापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. बीबीसीच्या एका कार्यक्रमामध्ये प्रोफेसर अॅन्डी यांनी तांदूळ शिजवण्याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे तांदळातील या रासायनिक पदार्थाची प्रभाव कमी केली जाऊ शकेल.

जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धीतीने बनवतात भात

प्रोफेसर अॅन्डी यांनी सांगितल्यानुसार, जास्तीत जास्त लोकं भात बनवण्यासाठी एका खास पद्धतीचा वापर करतात. तांदळामध्ये पाणी टाकून तोपर्यंत शिजवतात जोपर्यंत ते पाणी तांदळामध्ये पूर्णपणे शोषलं जात नाही. यामुळे तांदळातील आर्सेनिक कमी न होता ते तसेच रहाते. 

भात तयार करण्यासाठी ही पद्धत वापरा - 

- तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. यामुळे तांदूळ फुगतो आणि त्यातील आर्सेनिक निघून जाण्यासाठी मदत होते. 

- सकाळी तांदळातील पाणी फेकून द्या आणि स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्या. 

- जेवढे तांदूळ आहेत त्यापेक्षा पाच पट अधिक पाणी घालून तांदूळ शिजवून घ्या. 

- शिजलेला तांदूळ काढून घ्या आणि गरम पाण्याने धुवून घ्या. 

- तुमचा भात आर्सेनिकशिवाय तयार आहेत.

- ही पद्धत थोडी वेळखाऊ असली तरीदेखील सुरक्षित आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य