शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

पावसाळ्यामध्ये काय ठरतं फायदेशीर?; फळं की, फळांचे ज्यूस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 17:11 IST

फळं खाण्याऐवजी ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं? खरचं का? तुम्हाला काय वाटतं....?

जर तुम्ही विचार करत असाल की, फळं खाण्याऐवजी ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं, तर कदाचित तुमचा हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. खरं तर ज्यूसही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही फळांऐवजी ज्यूसचा पर्याय निवडणं हे कदाचित चुकीचं ठरू शकतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, पावसाळ्यामध्ये आहारतज्ज्ञ फळं खाण्याचा सल्ला देतात. तसेच बाजारात मिळणारे पॅकेटबंद ज्यूस किंवा फळांपासून तयार केलेले ज्यूसही पिण्याऐवजी फळंच फायदेशीर ठरतात, असं त्यांच म्हणणं असतं. जाणून घेऊया आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरतं? फळं खाणं की फळांचे ज्यूस पिणं?

फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिण्याचा ट्रेन्ड 

सध्या लोकांचा असा समज झाला असल्याचं दिसून येत आहे की, फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. असं समज होण्यामागील मुख्य कारणं म्हणजे, तुम्ही हे ज्यूस तुम्हाला पाहिजे तेव्हा पिऊ शकता. तसेच तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्येही हे अगदी सहज कॅरी करू शकता. हे सर्व खरं असलं तरिदेखील फळांऐवजी ज्यूस पिणं हा उत्तम पर्याय ठरू शकत नाही. कारण फळांमधील अनेक पोषक तत्व ज्यूस तयार करताना नष्ट होतात. तसेच पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियांमध्ये वाढ होते, त्यामुळे ज्यूसमध्ये बॅक्टेरियांचा समावेश होण्याची शक्यता असते. 

काय ठरतं उत्तम फळं की फळांचे ज्यूस? 

फळांमध्ये अस्तित्वात असणारं फायबर पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे पाणी शोषून घेण्यासाठी मदत करतं, त्यामुळे शरीर बराच काळापर्यंत हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. पण हेच जर फळांचा ज्यूस करायचं ठरवलं तर त्या प्रक्रियेमध्ये फळांमधील फायबर पूर्णपणे निघून जातात. 

वेगाने वाढते ब्लड शुगर 

शरीराला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स अब्जॉर्ब करण्यासाठी जेवढा वेळ लागतो. त्यापेक्षा कमी वेळात ज्यूस अब्जॉर्ब होतात. यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढते. अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. काही फळांच्या सालींमध्ये कॅन्सरच्या पेशी नष्ट करणारे न्यूट्रिशंस असतात. पण पॅकेटबंद ज्यूस तयार करताना फळांच्या साली काढून त्यानंतर त्यांचा वापर करण्यात येतो. तसेच डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी ज्यूस पिणं हेल्दी ऑप्शन नाही. 

इन्फेक्शनचा धोका अधिक 

पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त धोका हा इन्फेक्शनचा असतो. ज्यूस पॅकेटबंद असो किंवा तुम्ही तयार केलेला, त्यामध्ये घातक बॅक्टेरियांचा समावेश कोणत्याही प्रकारे होऊ शकतो. पण त्याऐवजी फळांमध्ये तुम्ही स्वतः हाताने निवडून त्यानंतर स्वच्छ धुवूनच खाता. 

पचनासंबंधिच्या तक्रारी...

फळांच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक नसतं. परंतु साखरेचं प्रमाण यामध्ये अधिक असतं. त्यामुळे फळांचा रस प्यायल्यानंतर अनेकदा लूज मोशन्स किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही ज्यूस जास्त पित असाल, तर शरीरामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे फळं खाताना अजिबात समस्या होत नाहीत. 

पॅकेटबंद ज्यूस वाढवतात वजन

पॅकेटबंद ज्यूसमध्ये हाय कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढू शकतं. यामध्ये एनर्जी लेव्हल मोठ्या प्रमाणावर असते. याचा वापर करून भूक वाढते. तसेच वजन वाढण्याची शक्यताही वाढते. अशातच वजन कमी करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. फळं खाल्याने पोट दिर्घकाळ भरल्याप्रमाणे वाटतं. ज्यामुळे तुम्ही फूड क्रेविंगपासून बचाव करू शकता. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह