शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यामध्ये काय ठरतं फायदेशीर?; फळं की, फळांचे ज्यूस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 17:11 IST

फळं खाण्याऐवजी ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं? खरचं का? तुम्हाला काय वाटतं....?

जर तुम्ही विचार करत असाल की, फळं खाण्याऐवजी ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं, तर कदाचित तुमचा हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. खरं तर ज्यूसही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही फळांऐवजी ज्यूसचा पर्याय निवडणं हे कदाचित चुकीचं ठरू शकतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, पावसाळ्यामध्ये आहारतज्ज्ञ फळं खाण्याचा सल्ला देतात. तसेच बाजारात मिळणारे पॅकेटबंद ज्यूस किंवा फळांपासून तयार केलेले ज्यूसही पिण्याऐवजी फळंच फायदेशीर ठरतात, असं त्यांच म्हणणं असतं. जाणून घेऊया आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरतं? फळं खाणं की फळांचे ज्यूस पिणं?

फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिण्याचा ट्रेन्ड 

सध्या लोकांचा असा समज झाला असल्याचं दिसून येत आहे की, फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. असं समज होण्यामागील मुख्य कारणं म्हणजे, तुम्ही हे ज्यूस तुम्हाला पाहिजे तेव्हा पिऊ शकता. तसेच तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्येही हे अगदी सहज कॅरी करू शकता. हे सर्व खरं असलं तरिदेखील फळांऐवजी ज्यूस पिणं हा उत्तम पर्याय ठरू शकत नाही. कारण फळांमधील अनेक पोषक तत्व ज्यूस तयार करताना नष्ट होतात. तसेच पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियांमध्ये वाढ होते, त्यामुळे ज्यूसमध्ये बॅक्टेरियांचा समावेश होण्याची शक्यता असते. 

काय ठरतं उत्तम फळं की फळांचे ज्यूस? 

फळांमध्ये अस्तित्वात असणारं फायबर पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे पाणी शोषून घेण्यासाठी मदत करतं, त्यामुळे शरीर बराच काळापर्यंत हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. पण हेच जर फळांचा ज्यूस करायचं ठरवलं तर त्या प्रक्रियेमध्ये फळांमधील फायबर पूर्णपणे निघून जातात. 

वेगाने वाढते ब्लड शुगर 

शरीराला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स अब्जॉर्ब करण्यासाठी जेवढा वेळ लागतो. त्यापेक्षा कमी वेळात ज्यूस अब्जॉर्ब होतात. यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढते. अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. काही फळांच्या सालींमध्ये कॅन्सरच्या पेशी नष्ट करणारे न्यूट्रिशंस असतात. पण पॅकेटबंद ज्यूस तयार करताना फळांच्या साली काढून त्यानंतर त्यांचा वापर करण्यात येतो. तसेच डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी ज्यूस पिणं हेल्दी ऑप्शन नाही. 

इन्फेक्शनचा धोका अधिक 

पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त धोका हा इन्फेक्शनचा असतो. ज्यूस पॅकेटबंद असो किंवा तुम्ही तयार केलेला, त्यामध्ये घातक बॅक्टेरियांचा समावेश कोणत्याही प्रकारे होऊ शकतो. पण त्याऐवजी फळांमध्ये तुम्ही स्वतः हाताने निवडून त्यानंतर स्वच्छ धुवूनच खाता. 

पचनासंबंधिच्या तक्रारी...

फळांच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक नसतं. परंतु साखरेचं प्रमाण यामध्ये अधिक असतं. त्यामुळे फळांचा रस प्यायल्यानंतर अनेकदा लूज मोशन्स किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही ज्यूस जास्त पित असाल, तर शरीरामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे फळं खाताना अजिबात समस्या होत नाहीत. 

पॅकेटबंद ज्यूस वाढवतात वजन

पॅकेटबंद ज्यूसमध्ये हाय कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढू शकतं. यामध्ये एनर्जी लेव्हल मोठ्या प्रमाणावर असते. याचा वापर करून भूक वाढते. तसेच वजन वाढण्याची शक्यताही वाढते. अशातच वजन कमी करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. फळं खाल्याने पोट दिर्घकाळ भरल्याप्रमाणे वाटतं. ज्यामुळे तुम्ही फूड क्रेविंगपासून बचाव करू शकता. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह