चवीने खाल्ल्या जाणाऱ्या 'या' गोड पदार्थांचा इतिहास माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:47 IST2018-09-06T15:28:17+5:302018-09-06T15:47:10+5:30
भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आढळून येते. त्याचप्रमाणे मिठाई किंवा गोड पदार्थांमध्येही विविधता आढळून येते.

चवीने खाल्ल्या जाणाऱ्या 'या' गोड पदार्थांचा इतिहास माहीत आहे का?
भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आढळून येते. त्याचप्रमाणे मिठाई किंवा गोड पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. आपल्या देशातील सण, उत्सव या गोड पदार्थांशिवाय अपूर्ण समजले जातात. सणांच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पण यातीलच काही पदार्थांना शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे. जाणून घेऊयात अशा काही गोष्टींबाबत...
गुलाबजाम
रसगुल्ला
लाडू
संदेश
संदेश बंगालची एक खास मिठाई आहे. नासलेल्या दूधापासून पनीर सारखा एक पदार्थ तयार करण्यात येतो त्यापासून ही मिठाई तयार करण्यात येते. फक्त हा पदार्थ पनीरपेक्षा फार मुलायम असतो. असं म्हटलं जातं की, हा पदार्थ सर्वात आधी पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आला होता. रसगुल्ल्याच्या आधीपासून संदेश पदार्थ बंगालमध्ये लोकप्रिय आहे. आधीच्या काळात नासलेलं दूध वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये साखर टाकून खाल्लं जात असे. तेव्हापासूनच संदेश या पदार्थ तयार करण्यास सुरुवात झाली.



