शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

बटाटे फ्रिजमध्ये ठेवत आहात? असं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 13:51 IST

अनेक खाद्यपदार्थ बराच काळ टिकवण्याच्या हेतूने आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. किचनमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणाऱ्या उपकरणांपैकी एक म्हणजे फ्रिज. फळं, भाज्या शिल्लक राहिलेलं जेवण स्टोअर करून ठेवण्यासाठी फ्रिज उपयोगी पडतो.

अनेक खाद्यपदार्थ बराच काळ टिकवण्याच्या हेतूने आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. किचनमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणाऱ्या उपकरणांपैकी एक म्हणजे फ्रिज. फळं, भाज्या शिल्लक राहिलेलं जेवण स्टोअर करून ठेवण्यासाठी फ्रिज उपयोगी पडतो. थोडक्यात सांगायचं झालचं तर फ्रिज अन्न वाया जाण्यापासून वाचवतो. परंतु फ्रिजचं थंड तापमान अनेकदा वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या होण्यासही कारणीभूत ठरतात. अशातच अनेक असे पदार्थ असतात की, जे फ्रिजमध्ये ठेवणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे बटाटा. 

जेव्हा आपण बटाटा फ्रिजमध्ये ठेवतो त्यावेळी फ्रिजमधील थंड तापमानामुळे बटाट्यामधील स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये होतं. त्यानंतर पुन्हा त्या साखरेचं रूपांतर एका केमिकलमध्ये होतं. अशा बटाट्यांचं सेवन केल्याने आपल्याला कॅन्सरचा धोका संभवतो. 

फूड स्टँडर्ड एजेंसीद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या बटाट्यांना जेव्हा आपण फ्राय करतो त्यावेळी बटाट्यामध्ये असलेली साखर त्यातील एमिनो अॅसिज अस्परॅगिनसोबत मिसळून जाते. त्यामुळे एक्राइलामाइड नावाचं केमिकल तयार होतं. 

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, ज्या खाद्यपदार्थांमध्ये स्टार्च आढळून येतं ते पदार्थ तळताना, भाजताना किंवा बेक करताना, ज्यावेळी उच्च तापमानाच्या संपर्कात येतात त्यावेळी एक्राइलामाइड नावाचं केमिकल आढळून येतं. या केमिकलचा वापर पेपर बनवण्यासाठी, प्लास्टिक तयार करण्यासाठी आणि कपड्यांना डाय करण्यासाठी करण्यात येतो. 

पहिल्यांदा 2002मध्ये एक्राइलामाइडबाबत समजलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत यावर अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. ज्यांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, जी लोकं उच्च तापमानामध्ये शिजवण्यात आलेले स्टार्च असणारे खाद्य पदार्थ खातात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. 

अमेरिकन कॅन्सर सोसायटच्या मते, बटाटे अजिबात फ्रिजमध्ये नठेवता ते नॉर्म रूम टेम्परेचरला आणि कोरड्या जागी ठेवावे. त्याचबरोबर अति उच्च तापमानावर बटाटे शिजवू नयेत. 

फूड एक्सपर्ट्स आणि शेफ यांनी सांगितल्यानुसार, बटाटे शिजवण्याआधी त्याची साल काढून 15 ते 30 मिनिटांसाठी ते पाण्यामध्ये भिजत ठेवा. असं केल्याने बटाटे शिजताना त्यामध्ये एक्राईलामाइड केमिकल तयार होण्याची शक्यता कमी होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य