शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बटाटे फ्रिजमध्ये ठेवत आहात? असं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 13:51 IST

अनेक खाद्यपदार्थ बराच काळ टिकवण्याच्या हेतूने आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. किचनमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणाऱ्या उपकरणांपैकी एक म्हणजे फ्रिज. फळं, भाज्या शिल्लक राहिलेलं जेवण स्टोअर करून ठेवण्यासाठी फ्रिज उपयोगी पडतो.

अनेक खाद्यपदार्थ बराच काळ टिकवण्याच्या हेतूने आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. किचनमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणाऱ्या उपकरणांपैकी एक म्हणजे फ्रिज. फळं, भाज्या शिल्लक राहिलेलं जेवण स्टोअर करून ठेवण्यासाठी फ्रिज उपयोगी पडतो. थोडक्यात सांगायचं झालचं तर फ्रिज अन्न वाया जाण्यापासून वाचवतो. परंतु फ्रिजचं थंड तापमान अनेकदा वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या होण्यासही कारणीभूत ठरतात. अशातच अनेक असे पदार्थ असतात की, जे फ्रिजमध्ये ठेवणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे बटाटा. 

जेव्हा आपण बटाटा फ्रिजमध्ये ठेवतो त्यावेळी फ्रिजमधील थंड तापमानामुळे बटाट्यामधील स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये होतं. त्यानंतर पुन्हा त्या साखरेचं रूपांतर एका केमिकलमध्ये होतं. अशा बटाट्यांचं सेवन केल्याने आपल्याला कॅन्सरचा धोका संभवतो. 

फूड स्टँडर्ड एजेंसीद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या बटाट्यांना जेव्हा आपण फ्राय करतो त्यावेळी बटाट्यामध्ये असलेली साखर त्यातील एमिनो अॅसिज अस्परॅगिनसोबत मिसळून जाते. त्यामुळे एक्राइलामाइड नावाचं केमिकल तयार होतं. 

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, ज्या खाद्यपदार्थांमध्ये स्टार्च आढळून येतं ते पदार्थ तळताना, भाजताना किंवा बेक करताना, ज्यावेळी उच्च तापमानाच्या संपर्कात येतात त्यावेळी एक्राइलामाइड नावाचं केमिकल आढळून येतं. या केमिकलचा वापर पेपर बनवण्यासाठी, प्लास्टिक तयार करण्यासाठी आणि कपड्यांना डाय करण्यासाठी करण्यात येतो. 

पहिल्यांदा 2002मध्ये एक्राइलामाइडबाबत समजलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत यावर अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. ज्यांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, जी लोकं उच्च तापमानामध्ये शिजवण्यात आलेले स्टार्च असणारे खाद्य पदार्थ खातात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. 

अमेरिकन कॅन्सर सोसायटच्या मते, बटाटे अजिबात फ्रिजमध्ये नठेवता ते नॉर्म रूम टेम्परेचरला आणि कोरड्या जागी ठेवावे. त्याचबरोबर अति उच्च तापमानावर बटाटे शिजवू नयेत. 

फूड एक्सपर्ट्स आणि शेफ यांनी सांगितल्यानुसार, बटाटे शिजवण्याआधी त्याची साल काढून 15 ते 30 मिनिटांसाठी ते पाण्यामध्ये भिजत ठेवा. असं केल्याने बटाटे शिजताना त्यामध्ये एक्राईलामाइड केमिकल तयार होण्याची शक्यता कमी होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य