शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

पदार्थ टिकवणा-या नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हबद्दल माहित आहे का? आपण ते रोजच वापरतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 18:14 IST

आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्यातले अनेक घटक हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतात. लसूण, हिमालयीन मीठ, लाल तिखट, साखर, लिंबू, व्हिनेगर हे घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनच काम करतात.

ठळक मुद्दे* लसणामध्ये अ‍ॅण्टि व्हायरल घटक असतात. हे घटक अन्नासोबतच शरीरातील अपायकारक जीवाणूंसोबत लढतात त्यांना रोखण्याचं काम करतात.* मुळात मीठ हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असतं. त्यात हिमालयीन मीठ हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरणं योग्य.* लाल तिखट हे चवीसाठी आणि पदार्थ टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. तसं पाहिलं तर मसाल्याचा प्रत्येक घटक हा जीवाणूंसोबत लढा देवून पदार्थ दिर्घकाळपर्यंत ताजा आणि चविष्ट ठेवतो.

- माधुरी पेठकर.कोणताही पदार्थ करताना मनात धाकधूक असतेच की हा पदार्थ खाईपर्यंत चांगला राहिल ना? आता बाहेरून आणल्या जाणा-या कितीतरी पदार्थात पदार्थ टिकवणारे रासायनिक घटक अर्थात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. त्यांच्यामुळे पदार्थ टिकतात. अशा पदार्थांबाबत काळजी नसते. पण असे कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह आरोग्यास हानी पोहोचवतात. त्यामुळे जे पदार्थ घरी बनवलेले आहेत, जे कमी काळासाठी टिकवायचे आहे त्यांच्यात कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह न टाकलेलेच बरे.खरंतर आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्यातले अनेक घटक हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतात. लसूण, हिमालयीन मीठ, लाल तिखट, साखर, लिंबू, व्हिनेगर हे घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनच काम करतात. त्यामुळे आपण कोणता पदार्थ करतो आहोत, तो गोड, तिखट, नमकीन कसा आहे, तो किती दिवस टिकवायचा आहे याचा विचार करून नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह वापरले तर फायदाच होतो.नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह वापरून दिर्घकाळ टिकणारा पदार्थ म्हणजे लोणचं. लोणच्यामध्ये मीठ, लसूण, लवंग, गूळ, लाल तिखट असे घटक असल्यानं लोणचं महिनोनमहिने टिकतं. या एका उदाहरणावरून नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हमध्ये किती ताकद असते हे लक्षात येतं.या नैसर्गिक घटकांमध्ये असं काय असतं जे पदार्थ टिकवून ठेवतात हे माहित करून घेणंही गरजेचं आहे. ते माहिती असलं की कशात कोणता घटक वापरला तर आपला पदार्थ टिकेल याचा आपला आपल्यालाच अंदाज येईल. 

 

लसूण 

लसणामध्ये अ‍ॅण्टि व्हायरल घटक असतात. हे घटक अन्नासोबतच शरीरातील अपायकारक जीवाणूंसोबत लढतात त्यांना रोखण्याचं काम करतात. त्यामुळेच अपण जर आपण सूप, डिप, सॅलड ड्रेसिंग अशा स्पेशल डिशेस बनवत असू तर त्यात आठवणीनं लसणाच्या कळ्या किंवा लसूण ठेचून घालायला हवा. यामुळे हे पदार्थ खूपवेळपर्यंत चांगले राहतात. या पदार्थांमधला ताजेपणा हे घटक टिकवून ठेवतात.हिमालयीन मीठ

मुळात मीठ हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असतं. त्यात हिमालयीन मीठ हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरणं योग्य. भाज्या, आमट्या, पास्ता, सूप, ड्रेसिंग्ज, डिप्स, स्प्रेडस असा कोणताही पदार्थ करताना त्यावर हिमालयीन मीठ हे चिमूटभर भुरभुरलं तर पदार्थ दीर्घकाळपर्यंत ताजा राहातो आणि त्यांची पौष्टिकताही वाढते. 

 

मोहरी, लाल तिखट

फोडणी देताना तेल तापलं की त्यात थोडे मोहरीचे दाणे टाकले जातात . ते काही चवीसाठी नाही. पदार्थ उशिरापर्यंत राहिला तरी तो उतरू नये हा त्यामागचा उद्देश असतो. अनेक पदार्थांमध्ये मस्टर्ड सॉस वापरलं जातं. पण त्यात काही प्रमाणात व्हिनेगर वापरलेलं असतं. लाल तिखट हे चवीसाठी आणि पदार्थ टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. तसं पाहिलं तर मसाल्याचा प्रत्येक घटक हा जीवाणूंसोबत लढा देवून पदार्थ दिर्घकाळपर्यंत ताजा आणि चविष्ट ठेवतो. त्यामुळे आइस्क्रिमसारख्या थंड पदार्थांवरही थोडं लाल तिखट भुरभुरण्याची फॅशन आहे. यामुळे चवीत फरक पडतो आणि पदार्थ टिकतोही.

 

 

लिंबू

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सायट्रिक अ‍ॅसिड असतं. हे अ‍ॅसिड पदार्थ टिकवून ठेवण्यात मोठी भूमिका पार पाडतं. लिंबाच्या सालीत आणि रसात पदार्थ टिकवून ठेवण्याची मोठी ताकद असते. लिंबू गार किंवा गरम पदार्थामध्ये पिळून टाकलं तर पदार्थ पुष्कळ वेळापर्यंत ताजा आणि चविष्ट राहातो. 

व्हिनेगर

व्हिनेगर हे साखर आणि पाणी वापरून बनवलेलं असतं. व्हिनेगरमध्ये अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड असतं. जे पदार्थातील अतिसूक्ष्म जीवाणूंसोबत लढा देतं. रोजच्या पदार्थांमध्ये थोडं साधं व्हिनेगर घातलं तर पदार्थ टिकून तर राहातोच शिवाय त्याची चवही वाढते.साखरसाखर ही अतिरिक्त पाणी शोषून घेण्यास मदत करते. पदार्थाला पाणी सूटून त्यात शरीरास हानिकारक जीवाणू वाढण्याची शक्यता असते. साखरेच्या वापरामुळे अशा जीवाणूंची वाढ होत नाही.