शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

पदार्थ टिकवणा-या नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हबद्दल माहित आहे का? आपण ते रोजच वापरतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 18:14 IST

आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्यातले अनेक घटक हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतात. लसूण, हिमालयीन मीठ, लाल तिखट, साखर, लिंबू, व्हिनेगर हे घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनच काम करतात.

ठळक मुद्दे* लसणामध्ये अ‍ॅण्टि व्हायरल घटक असतात. हे घटक अन्नासोबतच शरीरातील अपायकारक जीवाणूंसोबत लढतात त्यांना रोखण्याचं काम करतात.* मुळात मीठ हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असतं. त्यात हिमालयीन मीठ हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरणं योग्य.* लाल तिखट हे चवीसाठी आणि पदार्थ टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. तसं पाहिलं तर मसाल्याचा प्रत्येक घटक हा जीवाणूंसोबत लढा देवून पदार्थ दिर्घकाळपर्यंत ताजा आणि चविष्ट ठेवतो.

- माधुरी पेठकर.कोणताही पदार्थ करताना मनात धाकधूक असतेच की हा पदार्थ खाईपर्यंत चांगला राहिल ना? आता बाहेरून आणल्या जाणा-या कितीतरी पदार्थात पदार्थ टिकवणारे रासायनिक घटक अर्थात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. त्यांच्यामुळे पदार्थ टिकतात. अशा पदार्थांबाबत काळजी नसते. पण असे कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह आरोग्यास हानी पोहोचवतात. त्यामुळे जे पदार्थ घरी बनवलेले आहेत, जे कमी काळासाठी टिकवायचे आहे त्यांच्यात कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह न टाकलेलेच बरे.खरंतर आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्यातले अनेक घटक हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतात. लसूण, हिमालयीन मीठ, लाल तिखट, साखर, लिंबू, व्हिनेगर हे घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनच काम करतात. त्यामुळे आपण कोणता पदार्थ करतो आहोत, तो गोड, तिखट, नमकीन कसा आहे, तो किती दिवस टिकवायचा आहे याचा विचार करून नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह वापरले तर फायदाच होतो.नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह वापरून दिर्घकाळ टिकणारा पदार्थ म्हणजे लोणचं. लोणच्यामध्ये मीठ, लसूण, लवंग, गूळ, लाल तिखट असे घटक असल्यानं लोणचं महिनोनमहिने टिकतं. या एका उदाहरणावरून नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हमध्ये किती ताकद असते हे लक्षात येतं.या नैसर्गिक घटकांमध्ये असं काय असतं जे पदार्थ टिकवून ठेवतात हे माहित करून घेणंही गरजेचं आहे. ते माहिती असलं की कशात कोणता घटक वापरला तर आपला पदार्थ टिकेल याचा आपला आपल्यालाच अंदाज येईल. 

 

लसूण 

लसणामध्ये अ‍ॅण्टि व्हायरल घटक असतात. हे घटक अन्नासोबतच शरीरातील अपायकारक जीवाणूंसोबत लढतात त्यांना रोखण्याचं काम करतात. त्यामुळेच अपण जर आपण सूप, डिप, सॅलड ड्रेसिंग अशा स्पेशल डिशेस बनवत असू तर त्यात आठवणीनं लसणाच्या कळ्या किंवा लसूण ठेचून घालायला हवा. यामुळे हे पदार्थ खूपवेळपर्यंत चांगले राहतात. या पदार्थांमधला ताजेपणा हे घटक टिकवून ठेवतात.हिमालयीन मीठ

मुळात मीठ हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असतं. त्यात हिमालयीन मीठ हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरणं योग्य. भाज्या, आमट्या, पास्ता, सूप, ड्रेसिंग्ज, डिप्स, स्प्रेडस असा कोणताही पदार्थ करताना त्यावर हिमालयीन मीठ हे चिमूटभर भुरभुरलं तर पदार्थ दीर्घकाळपर्यंत ताजा राहातो आणि त्यांची पौष्टिकताही वाढते. 

 

मोहरी, लाल तिखट

फोडणी देताना तेल तापलं की त्यात थोडे मोहरीचे दाणे टाकले जातात . ते काही चवीसाठी नाही. पदार्थ उशिरापर्यंत राहिला तरी तो उतरू नये हा त्यामागचा उद्देश असतो. अनेक पदार्थांमध्ये मस्टर्ड सॉस वापरलं जातं. पण त्यात काही प्रमाणात व्हिनेगर वापरलेलं असतं. लाल तिखट हे चवीसाठी आणि पदार्थ टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. तसं पाहिलं तर मसाल्याचा प्रत्येक घटक हा जीवाणूंसोबत लढा देवून पदार्थ दिर्घकाळपर्यंत ताजा आणि चविष्ट ठेवतो. त्यामुळे आइस्क्रिमसारख्या थंड पदार्थांवरही थोडं लाल तिखट भुरभुरण्याची फॅशन आहे. यामुळे चवीत फरक पडतो आणि पदार्थ टिकतोही.

 

 

लिंबू

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सायट्रिक अ‍ॅसिड असतं. हे अ‍ॅसिड पदार्थ टिकवून ठेवण्यात मोठी भूमिका पार पाडतं. लिंबाच्या सालीत आणि रसात पदार्थ टिकवून ठेवण्याची मोठी ताकद असते. लिंबू गार किंवा गरम पदार्थामध्ये पिळून टाकलं तर पदार्थ पुष्कळ वेळापर्यंत ताजा आणि चविष्ट राहातो. 

व्हिनेगर

व्हिनेगर हे साखर आणि पाणी वापरून बनवलेलं असतं. व्हिनेगरमध्ये अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड असतं. जे पदार्थातील अतिसूक्ष्म जीवाणूंसोबत लढा देतं. रोजच्या पदार्थांमध्ये थोडं साधं व्हिनेगर घातलं तर पदार्थ टिकून तर राहातोच शिवाय त्याची चवही वाढते.साखरसाखर ही अतिरिक्त पाणी शोषून घेण्यास मदत करते. पदार्थाला पाणी सूटून त्यात शरीरास हानिकारक जीवाणू वाढण्याची शक्यता असते. साखरेच्या वापरामुळे अशा जीवाणूंची वाढ होत नाही.